corona deaths sakal
मुंबई

मुंबई : मृत्यूदर रोखण्यात पालिकेला यश 44 दिवसांत 275 मृत्यू

प्रत्येक दिवशी सरासरी 6 मृत्यूंची नोंद

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महापालिकेला दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत मृत्यूदर रोखण्यात मोठ्या प्रमाणात यश आले आहे. कारण, जगात जेवढ्या प्रमाणात मृत्यू झालेत त्याच्या तुलनेत लोकसंख्या जास्त असूनही मुंबई महानगर पालिकेने मृत्यू नियंत्रणात ठेवले आहेत. मुंबईत 21 डिसेंबरपासून तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली. 21 डिसेंबर 2021 ते 2 फेब्रुवारी 2022 पर्यंत एकूण 275 मृत्यूंची मुंबईत नोंद झाली आहेत. म्हणजेच एका दिवसांत सरासरी 6 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. तर, दुसऱ्या लाटेत मुंबईत कोविड रुग्णसंख्या जास्त असली तरी फक्त 3, 484 मृत्यू नोंदले गेले होते.

दुसरी लाट मुंबईत 10 फेब्रुवारी 2021 ते 31 मे 2021 अशी शंभर दिवस सुरु होती. त्यात 3 लाख 93 हजार कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आणि एकूण मृत्यूचा आकडा 3484 म्हणजे मृत्यूची टक्केवारी ही जगात सर्वात कमी होती. याचे प्रमाण 0.8 टक्के एवढे सर्वात कमी होते. तर, 21 डिसेंबर 2021 पासून सुरु झालेल्या तिसऱ्या लाटेत फक्त 44 दिवसांत 2 लाख 81 हजार पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. आणि फक्त 275 मृत्यू झाले आहेत. त्यामुळे, सरासरी प्रतिदिवस सहा मृत्यू झाले असून मृत्यूदर रोखण्यात पालिकेने उत्तम काम केले असे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी स्पष्ट केले आहे.

तिसऱ्या लाटेतील मृत्यूचा आकडा हा एक अंकी आहे, यात पालिकेने अत्यंत महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे असेही चहल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकांकडून छळ… दिल्ली मेट्रो प्लॅटफॉर्मवरून उडी मारत जीवन संपवलं! शेवटचं वाक्य अंगावर काटा आणणारं

Latest Marathi News Update LIVE : जळगावमध्ये शिवारात 23 लाखांची 'गांजाची शेती' केली उद्ध्वस्त

Bihar Probable Ministers List : नितीशकुमार यांच्या नवीन मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी आली समोर!

Amravati Crime: अमरावती हादरली! युवकाची पूर्ववैमनस्यातून हत्या

Bicycle Riding: 'सोलापूरच्या चौघांनी के२के सायकल रायडिंगमध्ये रचला इतिहास'; काश्मीर ते कन्याकुमारी १६ दिवसांमध्ये ४२०० किमी प्रवास पूर्ण..

SCROLL FOR NEXT