मुंबई

शेतकरी कर्जमाफी घोषणा श्रेयासाठी सर्वपक्षीय लढाई सुरू

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - शेतकरी मागण्यांपुढे नमलेल्या सरकारने तत्वतः कर्जमाफीची घोषणा केली. या घोषणेनंतर सर्व राजकीय पक्षामध्ये श्रेयासाठी सध्या लढाई सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

नगर जिल्हयातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांच्या गटाने शेतकरी संपाची घोषणा केली. त्यानंतर या शेतकरी संपाचे लोण राज्यभर पसरले.

सुरवातील ताठर भूमिका घेणाऱ्या सरकारने यानंतर संपाची झळ बसू लागताच शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. यानंतर याचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षाची चढाओढ लागली आहे. सत्ताधारी भाजपाने काही दिवसांपूर्वीच शहरांमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानणारे फलक लावले आहेत. सत्तेतील सहभागी शिवसेनेने याचे श्रेय घेतले आहे."आमच्या बडग्यामुळेच सरकारला कर्ज माफी करावी लागली' असे म्हटले आहे.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने या घोषणेचे श्रेय घेताना "आम्ही काढलेल्या संघर्ष यात्रेमुळेच सरकारवर दबाव येउन ही कर्जमाफी केली आहे' असे म्हटले आहे. आमदार बच्चू कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी श्रेय घेताना आम्ही काढलेल्या अनुक्रमे आसूड आणि आत्मक्‍लेश यात्रांमुळे सरकारला नमते घ्यावे लागले असे म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT