मुंबई

नागपुरात सर्वाधिक मद्यपी वाहनचालक

सुशांत मोरे

राज्यात तळीराम वाहनचालकांच्या संख्येत सातत्याने वाढ
मुंबई - दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांची संख्या राज्यात वाढते आहे. राज्यात 2016 पासून आतापर्यंत केलेल्या कारवाईत अशा एक लाख 36 हजार प्रकरणांची नोंद झाली असून, उपराजधानी नागपूर त्यात आघाडीवर आहे.

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर शहरात 2016 पासून 35 हजार 274 प्रकरणांची नोंद झाली आहे. मुंबई शहरात 26 हजार 746 आणि पुणे शहरात 24 हजार 360 प्रकरणे दाखल आहेत. अन्य जिल्ह्यांत पुणे ग्रामीण, नागपूर ग्रामीण, ठाणे शहर, औरंगाबाद शहर, नवी मुंबई, सांगली ग्रामीण, सोलापूर ग्रामीण यांचा समावेश आहे.

तळीरामांवर केलेल्या कारवाईत 16 कोटी 47 लाख 57 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, शहरी आणि ग्रामीण भागांबरोबरच महामार्गावरही बॅनर, होर्डिंग लावून याबाबत जनजागृती केली जाते. महाविद्यालयांत तसेच पथनाट्ये सादर करून लोकांना आवाहन केले जाते. दारू पिऊन वाहन चालविल्यामुळे होणारे अपघात, गुन्हे यांची माहिती दिली जाते.

अन्य जिल्ह्यांतील कारवाई (जानेवारी 2016 ते जून 2017)
जिल्हा प्रकरणे

पुणे ग्रामीण 4,176
सांगली 4,301
सोलापूर ग्रामीण 1,309
चंद्रपूर 3,531
नागपूर ग्रामीण 4,523
पालघर 1,269
ठाणे शहर 14,580
औरंगाबाद शहर 1,106
नवी मुंबई 4,256

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

Anil Navgane Attack: ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला, भरत गोगावलेंच्या पुत्रासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

Gautam Adani: कोण आहेत गौतम अदानींचे राईट हँड? डॉक्टर ते उद्योगपती असा आहे प्रवास; चालवतात 20,852 कोटींची कंपनी

Parineeti Chopra : पतीसाठी परिणीतीच्या लंडनला फेऱ्या; राघववर पार पडली मोठी शस्त्रक्रिया

SCROLL FOR NEXT