Crime  esakal
मुंबई

Mumbai Crime : मुंबईत १३९ फ्लॅट खरेदीदारांची कोट्यवधींची फसवणूक; डेव्हलपर विरोधात गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Crime : १३९ फ्लॅट खरेदीदारांची ४५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विकसाक, त्याच्या कुटुंबातील तीन सदस्य आणि दोन साथीदारांविरुद्ध मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे.

इम्तियाज हसन अली मरेडिया, प्यार अली मरेडिया, बरकत अली मोमीन, नुरुद्दीन मखनोजिया, सानिफ मरेडिया आणि आकील मरेडिया अशी आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणातील तक्रारदार मोईनुद्दीन बोरा हे अंधेरीचे रहिवासी आहेत. आरोपी बांधत असलेल्या जोगेश्वरीतील एस. व्ही. रोडवरील बहुमजली ‘मॅरेडियन हाईट्स’मध्ये घर घेण्यासाठी तक्रारदाराच्या वडिलांनी विकसकाला पैसे दिले होते.

आरोपींनी जोगेश्वरी पश्चिमेकडील आलिशान टॉवर ‘मॅरेडियन हाईट्स’ बांधण्याच्या बहाण्याने गृह खरेदीदारांकडून पैसे घेतले होते. तथापि इमारतीचा प्रकल्प पूर्ण करण्यात विकसक अयशस्वी झाला. त्याऐवजी आरोपीने घर खरेदीदारांचे पैसे स्वतःच्या स्वार्थासाठी इतरत्र वापरले.

घर खरेदीदाराच्या तक्रारीच्या आधारे, आर्थिक गुन्हे शाखेने प्रथम गुरुवारी आंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आणि नंतर तपास हाती घेतला. आरोपीने १३९ फ्लॅट खरेदीदारांकडून ४५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. येत्या काळात आरोपींचा या प्रकरणी जबाब नोंदवून पुढील कारवाई आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT