मुंबई

मुंबईकरांनो काळजी घ्या! शहराच्या तापमानाचा पारा वाढतोय

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईच्या तापमानात वाढ होत असून पारा 35 अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. सोमवारी (ता. 20) सांताक्रुझ येथे 37.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. रविवारी शहरातील तापमान 35 अंश सेल्सिअस होते. आतापर्यंत एप्रिल महिन्यातील  हे सर्वाधिक तापमान आहे. सध्या तापमान वाढत असले तरी, हळू हळू तापमानात घट होईल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

सोमवारी कुलाबा येथे कमाल तापमान 35.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेल. मुंबई उपनगरात मुलूंड पश्चिम आणि कालिदास येथे सर्वाधिक 39.98 अंश सेल्सिअसची नोंद झाली. त्याखालोखाल जोगेश्वरी लिंक रोड येथे 39..70 अंश सेल्सिअस, बोरीवली पूर्वमध्ये 39.40, तर गोरेगाव येथे 38.80 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यात दिलासा म्हणजे, पुढील चार दिवसांत कोकणासह मुंबईत तापमान हळूहळू कमी होईल. आकाश निरभ्र राहील, अशी शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.

अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा
 
किमान तापमना (अंश सेल्सिअसमध्ये)
कुलाबा - 27.2
सांताक्रुझ - 26.4 

हवेतील आर्द्रतेचे प्रमाण
कुलाबा - 62 टक्के
सांताक्रुझ - 31 टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Dog Life Imprisonment : ऐकावं ते नवलच! आता उत्तर प्रदेशात कुत्र्यालाही होणार जन्मठेप; योगी सरकारचा नवा निर्णय

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Thane Traffic: घोडबंदर मार्गावर दिवसा 'या' वाहनांना नो एन्ट्री, एकनाथ शिंदे यांचे निर्देश जारी

OCD Explained: OCD म्हणजे फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही! डॉक्टरांनी सांगितले ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरचे खरे स्वरूप

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT