eknath shinde sakal media
मुंबई

नैना प्रकल्प: शेतकऱ्यांकडून वसुल होणाऱ्या सुधारणा शुल्क वसुलीसाठी स्थगिती

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : रायगड जिल्ह्यातील नैना प्रकल्पाअंतर्गत प्रकल्पबाधित शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. असे सांगत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे या शेतकऱ्यांकडून वसुल करण्यात येणार्‍या सुधारणा शुल्काच्या वसुलीसाठी स्थगिती देण्याची घोषणा आज विधान परिषदेत केली. नैना प्रकल्पाच्या पायाभूत सुविधासाठी सिडको खर्च उचलणार आहे. जमिनीचा मोबदला न देता २२.५ टक्के जास्त जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे. ४० टक्के जमिन भूमीपूत्र शेतकऱ्यांना आणि ६० टक्के सिडकोला असे धोरण सिडकोने तयार केल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

विधान परिषदेचे सदस्य जयंत पाटील यांनी अल्पकालीन चर्चेद्वारे नैना प्रकल्पातील शेतकऱ्यांकडून गुंठ्यावर आकारण्यात येणार्‍या प्रचंड रकमेबाबतचा अल्पकालीन चर्चेच्या माध्यमातून विधानपरिषदेत हा विषय मांडला होता.

प्रकल्पबाधित शेतकऱ्यांकडून प्रत्येक गुंठ्यावर प्रचंड रक्कम आकारली जात होती. शेतकर्‍यांना, भूधारकांना ६० टक्के हिस्सा, या प्रकल्पामध्ये शेतकरी आणि विकासक जे बाधित होतील त्यांना मिळणार्‍या अंतिम ४० टक्के भूखंडावर प्रत्येक गुठ्यांवर प्रचंड रक्कम आकारली जात असल्याचे जयंत पाटील यांनी सभागृहात सांगितले. त्यावर वनजमीन तसेच गावठाण भागातील शेतकऱ्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

नैना प्रकल्पाला गती देण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून ११ टाऊन प्लान तयार करण्यात आले आहे. टाऊन प्लॅन १ आणि २ योजनेला शासनाने मंजुरी दिली आहे. विकास योजना पूर्ण झाली आहे. विकास योजना दोनच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत. विकास योजना ३ शासन मंजूरीसाठी आहे. टीपी स्किम ४, ५, ६, ७, ८ याबाबत लवकर सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. रस्ते, दिवाबत्ती, गटार, पाणीपुरवठा योजना, वाहतूक व्यवस्था, मैदान, शाळा, हॉस्पिटल ही सर्व विकास कामे करायची आहेत. या सर्व पायाभूत सुविधा देण्यासाठी सिडको खर्च उचलणार आहे. सध्या ४६१ चौ.मी क्षेत्राचा विकास करण्याचे धोरण आहे, असे एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली. मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबईची स्थापना करण्यात आली. नैना प्रकल्पाची स्थापना १० जानेवारी २०१३ रोजी करण्यात आली. या प्रकल्पाच्या माध्यमातून अशा प्रकारचा विकास नैनाच्या माध्यमातून अपेक्षित होता. ज्याप्रकारे कामाला गती मिळायला पाहिजे होती ती काही अडचणींमुळे मिळाली नाही ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पात शेती गेल्यानंतर त्यांना अंतिम भूखंड मिळाल्यानंतर शेतकरी दाखलाही देण्याचा विषय मार्गी लावला जाईल असे त्यांनी सांगितले. नवीन टीपी स्किमनुसार हे प्रकल्प टप्प्याने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT