ncp leader sharad pawar wrote letter to cm uddhav thackeray koregaon bhima Photo Source : New Indian Express 
मुंबई

कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

सकाळ डिजिटल टीम

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, ही दंगल म्हणजे तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा कट होता, असा आरोप शरद पवार यांनी केल्याची माहिती आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असल्याची सूत्रांची माहिती आहे. या दंगलीची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. शरद पवार यांच्या या पत्रामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहेत.

काय आहे पत्रात?
मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांचे पत्र दोन पानांचे आहे. त्यात त्यांनी कोरेगाव भीमा दंगलीची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हा गंभीर आरोप आहे. पत्रात म्हटले आहे की, कोरेगाव-भीमा दंगलीच्या वेळी देवेंद्र फडणवीस सरकारने सत्तेचा गैरवापर केला. त्यामुळं या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. सरकारने दंगलीच्या सूत्रधारांना पाठिशी घातले आणि राज्यातील जनतेची फसवणूक केली. दंगलीचे पुरावे सादर करताना पोलिसांनी मोडून-तोडून सादर केले आहेत. सरकारने पोलिसांच्या मदतीने हा दंगलीचा कट रचल्याचा आरोप, पवारांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

काय घडलं होतं?
पुणे जिल्ह्यात कोरेगाव-भीमा येथे 1 जानेवारी रोजी विजय दिवस साजरा केला जातो. 1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव-भीमाच्या लढाईला 200 वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी लाखोंच्या संख्येने दलित बांधव कोरेगाव-भीमा येथे पोहोचले होते. त्यावेळे तेथे दंगल उसळली. या दंगलीचे लोण राज्यभर पसरले आणि इतर शहरांमध्येही दंगलीचे प्रकार घडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापूर जिल्ह्यातील वास्तव! २०२५ मध्ये ३४२ अल्पवयीन मुलींचे अपहरण अन्‌ १८५४ महिला-तरुणी बेपत्ता; ४० अल्पवयीन मुली अन्‌ २८५ महिला सापडल्याच नाहीत

Adolescent Mental Health : पौगंडावस्थेतील मानसिक आरोग्य; मुलांच्या मनातील गोंधळ आणि पालकांची जबाबदारी

मोठी बातमी! १५००० घेऊनही सोलापूरमधील अर्धा लाख लाभार्थींनी घरकुलांचे बांधकाम सुरुच केले नाही; राज्य सरकारचे ५० हजार मिळेनात, २७०० जणांना घरासाठी नाही जागा

Morning Breakfast Recipe: सकाळचा नाश्ता हेल्दी आणि टेस्टी! झटपट बनवा टेस्टी पालक पराठा, रेसिपी आहे अगदी सोपी

Panchang 28 January 2026: आजच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण आणि ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT