4NCP_Logo_h01.jpg 
मुंबई

'अभय योजना' लवकर सुरु न केल्यास राष्ट्रवादीच्यावतीने 'हल्लाबोल'

दीपक हीरे

वज्रेश्वरी : शहरातील नागरिकांकडून घरपट्टी व पाणीपट्टी कर नियमित भरले जात नसल्याने भिवंडी महापालिकेवर आर्थिक बोजा वाढत आहे. या आर्थिक संकटातून महापालिकेला सावरण्यासाठी व मालमत्ता धारकांनी थकीत कर लवकरात लवकर भरावे. यासाठी मनपा प्रशासनाने मागील काही वर्षांपासून नागरिकांच्या सोयीसाठी 'अभय योजना' सुरु केली आहे. या अभय योजनेच्या माध्यमातून शहरातील स्थानिक रहिवासींना थकीत घरपट्टी व पाणीपट्टीवर मनपा प्रशासनाकडून आकारण्यात आलेला व्याज १०० टक्के माफ केला जात होता. या योजनेमुळे मालमत्ता धारकांनी मोठ्या प्रमाणात थकीत कर भरला होता. ज्यामुळे मनपा प्रशासनाच्या तिजोरीत देखील रक्कम जमा होण्यास मदत झाली होती .

मात्र,  आता मनपा प्रशासनाने हि 'अभय योजना' बंद केली आहे. त्यामुळे मालमत्ता धारकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून नागरिकांच्या असंतोषात वाढ झाली आहे . नागरिकांच्या या असंतोषाची दखल राष्ट्रवादी कॉँग्रेसचे भिवंडी शहर अध्यक्ष खालिद गुड्डू यांनी घेतली. ''मनपा प्रशासनाने नागरिकांसाठी आवश्यक असणारी अभय योजना लवकरात लवकर सुरु करावी'' अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे मनपा आयुक्त मनोहर हिरे यांच्याकडे केली आहे . दरम्यान, ''आठ दिवसांच्या आत आपल्या मागणीची दखल मनपा प्रशासनाने घेतली नाही तर मनपा प्रशासन विरोधात 'हल्ला बोल' मोर्चा काढण्यात येईल. '',असा इशारा देखील खालिद गुड्डू यांनी मनपा प्रशासनास दिला आहे. 

भिवंडी शहरातील यंत्रमाग व्यवसाय मागील काही वर्षांपासून डबघाईला आला आहे. अनेक यंत्रमाग उद्योग बंद झाले असल्याने या यंत्रमाग उद्योगावर आधारित असलेले अनेक छोटे मोठे उदयोग देखील बंद झाले आहेत. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात मंदीचे सावट पसरलेले असून नागरिकांवर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यातच आता मनपा प्रशासनाने थकीत मालमत्ता धारकांसाठी आवश्यक असणारी 'अभय योजना' बंद करण्याचा फर्मान काढला असल्याने शहरातील नागरिकांमध्ये मनपा प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात तीव्र संताप पसरला आहे.

विशेष म्हणजे अभय योजनेमुळे वर्षानुवर्षे मालमत्ता कर न भरणाऱ्या थकीत मालमत्ता धारकांनी देखील आपले कर भरले आहेत, त्यामुळे मनपा प्रशासनास मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा देखील झाला आहे. असे असताना आता अचानक हि अभय योजना मनपा प्रशासनाने अचानक बंद का केली ?  असा सवाल नागरिकांना पडला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताने Asia Cup जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये अफगाणी विद्यार्थ्याने दिल्या 'जय हिंद'च्या घोषणा! Video Viral

JNU Ravan Dahan controversy : उमर खालिद अन् शरजीलचे फोटो पुतळ्यावर लावून 'जेएनयू'मध्ये झाले रावणाचे दहन!

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती आहे की नाही? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर देत विषयच संपवला, म्हणाले...

World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT