

Role of Tribal Development and Welfare
Sakal
नक्षलवादी शस्त्रास्त्रे हातात घेऊन व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी उभे ठाकल्यानंतर त्यांची चळवळ मोडून काढण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागणार हे उघडच होते. तरीही त्यात आजवर वेगवेगळ्या कारणांमुळे यश येत नव्हते. सरकार, पोलिस व सुरक्षा दलांनी व्यूहनीती आखून त्या दिशेने केलेल्या प्रयत्नांना आता मात्र यश येत असल्याची चिन्हे आहेत. परंतु हे यश टिकाऊ राहायचे असेल तर या सुरक्षात्मक उपायांना विधायक उपायांची जोड द्यावी लागेल. याचे कारण या चळवळीचा मुख्य भाग संघटित हिंसक कारवायांचा असला तरी दुसरा विचारसरणीचा असतो आणि ती पसरविण्यासाठी सर्व प्रकारची पारंपरिक आणि आधुनिक माध्यमे वापरली जातात.