मुंबई

किरकोळ दुकानातूनही कांदा गायब 

शर्मिला वाळुंज

ठाणे : कांद्याचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत असल्याने ग्राहकांना रडण्याची वेळ आली आहे. एकीकडे ग्राहकांवर ही वेळ आली असताना किरकोळ विक्रेतेही विक्रीसाठी जादा दराने कांदा घेण्याचा कोणताही धोका पत्करण्याच्या मानसिकतेत नाहीत. परिणामी दर तेजीत असेपर्यंत किरकोळ दुकानांतूनही कांदा गायब होत चालला आहे. काही ग्राहक हवा तेवढा कांदाच खरेदी करत आहेत. सुका-जुना कांदा मिळत नाही आणि ओला-नवीन कांदा नाशवंत असल्याने सध्या काही दिवस कांद्याचा व्यापार नकोच, असे म्हणण्याची वेळ ठाण्यातील विक्रेत्यांवर आली आहे. 

कांद्याने शंभरी ओलांडल्याने घाऊक बाजारात कांद्याची आवक घटत आहे. चांगल्या दर्जाचा कांदा घाऊक बाजारात 120 रुपये प्रतिकिलोच्या आसपास पोहोचला आहे. किरकोळ बाजारात हाच कांदा 140 ते 160 रुपये किलोच्या घरात आहे. नाशिक, नगर जिल्ह्यातून नवीन कांदा येण्यास सुरुवात झाली असली तरी या कांद्याचा दर घाऊक बाजारात 60 रुपये प्रतिकिलोच्या आसपास आहे.

परंतु, हा कांदा ओला असून तो जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे जुन्या कांद्यालाच ग्राहक पसंती देतात. मात्र, या कांद्याचे दर गगनाला भिडल्याने दररोजच्या ग्राहक संख्येतही घट झाल्याचे ठाणे बाजारपेठेतील विक्रेते सांगतात. परिणामी जादा दराने कांदा घेतला तरी त्यामागे "काही' पैसेच सुटत असल्याने या कांद्याचा व्यवसायच नको, असे म्हणण्याची वेळ विक्रेत्यांवर आली आहे. 

शहरातील मुख्य बाजारपेठेत कांदा-बटाटा होलसेल विक्रेत्यांकडेच कांदा विक्रीसाठी असून दुकानांमध्ये केवळ दिवसाला पाच ते दहा किलो कांदा विक्रीसाठी ठेवला जात असल्याचे निदर्शनास येते. त्यातही ते छोटे-छोटे आणि जास्त सुकलेले कांदे किरकोळ असल्याने चांगल्या कांद्यासाठी ग्राहकांना दोन-तीन दुकाने पालथी घालावी लागत आहेत. काही ग्राहक तर केवळ दराची चौकशी करून खरेदी टाळत असल्याचे दिसून येते. 

कांद्यामध्ये गुंतवणूक करणे सध्या परवडत नाही. दर वाढत असल्याने ग्राहकांची संख्या गेल्या महिन्यापासून रोडावली आहे. यामुळे सध्या आमच्याकडे उपलब्ध असलेलाच कांदा विक्री करणार असून, नवीन कांदा तूर्तास खरेदी केलेला नाही. 
- राजन पटेल, कांदा विक्रेते 

कांद्याचे दर दिवसेंदिवस वाढत असून नवीन कांद्याचे दर कमी असले तरी तो विक्रीसाठी खरेदी करणे आम्हालाच परवडणारे नाही. त्यातील अर्धा माल हा खराब होतो. शिवाय कांद्याचे दर पाहून ग्राहकही खरेदी करण्यास खूप विचार करीत आहेत. ग्राहकांची संख्या कमी झाल्याने आहे तो माल संपल्यानंतरच नवीन माल आणायचा की नाही, याचा विचार केला जाईल. 
- लालन शेवाळे, 
कांदा विक्रेते  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT