मुंबई

'गौरी-गणपती'साठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे नियोजन अधांतरीच; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत ठोस निर्णय नाही

तुषार सोनवणे

मुंबई – राज्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव लक्षात घेता जिल्हांतर्गत वाहतूक बंद आहे. वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने काही उपाययोजना केल्या आहेत. परंतु काही दिवसातच गौरी गणपतीचा सण येऊन ठेपल्याने, मुंबई आणि परिसरातील चाकरमानी कोकणात आपल्या घरी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जात असतात. परंतु जिल्हाबंदी आणि कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जाणाऱ्या येणाऱ्या चाकरमान्यांना काही नियम अटींनुसार प्रवास करता यावा यासाठी राज्याचे परिवहन मंत्र्यांसह इतर मंत्री आणि कोकणातील लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. त्यावेळी संबधित विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. याबाबतची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

मुंबईतून चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी कोणती साधने उपलब्ध असतील, संबधित गावी जाऊन क्वॉरंटाईन कालावधी तसेच धोरण काय असू शकेल? असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात आहेत. यासाठी यंत्रणा सज्ज आहे आहे का? दूर्दवाने कोकणाकडे कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला तर तेथील आरोग्य यंत्रणा तयार आहेत का? अशा अनेक मुद्द्यांवर धोरण ठरवणे गरजेचे आहे. त्यामुळे आज झालेल्या बैठकीत हे सर्व मुद्दे चर्चीले  गेले.

कोकणात कोणत्या ठिकाणी चाकरमान्यांना जायचे आहे? त्यांचा क्वारंटाईन कालावधी किती असला पाहिजे? अशा प्रवास करणाऱ्यांची संख्या किती? कोणत्या जिल्ह्यात किती चाकरमानी प्रवास करणार? याबाबात कोकणातील लोकप्रतिनिधींनी मंत्रीमंडळाशी चर्चा केली.

यासर्व बाबींचा विचार करता. सविस्तर मार्गदर्शक तत्व किंवा नियमावली तयार करण्यात येणार असून तसेच आजच्या चर्चेचा सारांश मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानूसार योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे. असे परिवहन मंत्र्यांनी सांगितले.

परिवहन मंत्र्यांच्या पत्ररकार परिषदेतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी निश्चित नियमावली तयार नसल्याचे सध्यातरी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोकणात गौरी गणपतीच्या पुजेसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचे नियोजन अजूनही अधांतरी राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Latest Marathi News Updates : ३१ महादेव कोळी समाजाचा लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

Smriti Mandhana: शाब्बास पोरी! स्मृती मानधनाचा जगभरात दबदबा, वन डे वर्ल्ड कपपूर्वी ICC ने दिली आनंदाची बातमी

Gemini Retro Saree Trend होतोय खूप व्हायरल; पण फोटो बनवताना अजिबात करू नका 'या' 5 चुका, नाहीतर इमेज खराब होणारच

Hidden Story: समुद्राखाली दडलेलं सोनं-चांदीपेक्षा मौल्यवान काय आहे? भारत उलगडणार रहस्य, चावी मिळाली

SCROLL FOR NEXT