railway  sakaln
मुंबई

Railway: उरण-खारकोपर रेल्वे मार्ग सुरु होईना; नागरिक त्रस्त

Chinmay Jagtap

उरण रेल्वे मार्ग सुरू करण्यासाठी रेल्वे विभागाच्या सर्व चाचण्या होऊनही वर्षभर रखडलेला उरण-खारकोपर रेल्वे मार्ग सुरू करा या मागणीसाठी गुरुवारी (ता. ७) काँग्रेसच्या वतीने गाजर दाखवा आंदोलन करण्यात आले. या वेळी रेल्वे आणि मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. हा रेल्वेमार्ग सुरू न झाल्याने नागरिक, विद्यार्थ्यांसह व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

जनतेसाठी सर्वांत स्वस्त व सुरक्षेचा चांगला प्रवास म्हणून रेल्वे सेवेकडे पाहिले जाते. मुंबई जवळ असूनसुद्धा उरण तालुक्यातील जनता रेल्वे सेवेपासून वर्षानुवर्षे वंचित राहिली आहे. सहा महिन्यांपूर्वी उरण ते खारकोपर रेल्वेची चाचणीसुद्धा झाली. मात्र, सहा महिने उलटूनही अद्याप उरण ते खारकोपर रेल्वे सेवा सुरू झाली नाही.

रेल्वेचे प्रशासनातर्फे रेल्वे सुरू होणार असल्याच्या तारखा वारंवार बदलण्यात येत आहेत. जनतेच्या समस्यांचा, भावनांचा विचार होत नसल्याने उरण तालुका व उरण शहर काँग्रेसने याबाबत आक्रमक भूमिका घेतली. काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यासाठी गुरवारी उरण रेल्वेस्थानकाच्या मुख्य गेटसमोर गाजर दाखवा आंदोलन करण्यात आले.

या वेळी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक सरचिटणीस रेमंड लोवीयस, काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष किरीट पाटील, राष्ट्र सेवादलाचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष वैभव ठाकूर, तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, महिला तालुकाध्यक्ष रेखा घरत, माजी नगरसेवक बबन कांबळे, शहराध्यक्ष प्रकाश पाटील, शहराध्यक्ष अफशा मुकरी, देवीदास थळी आदींनी मनोगत व्यक्त करून रेल्वे सुरू होत नसल्याबाबत केंद्र व राज्य शासनाचा निषेध केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT