मुंबई

'आधी सरकारशी हात जोडून बोलू, नाहीतर मग हात सोडून बोलू'; राज ठाकरेंचा इशारा

तुषार सोनवणे

मुंबई - विद्यार्थी पालक समन्वय समितीने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली. गेल्या अनेक महिण्यांपासून अकरावीच्या प्रवेशाचा तीढा सूटलेला नाही. 

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यापासून अकरावीचे प्रवेश रखडले आहेत. तसेच राज्यातील महाविद्यालयांमध्ये तसेच शाळांमधील वाढीव फीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थी पालक समन्वय समितीने या प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू व्हाव्यात तसेच अवास्तव फीवाढीला लगाम लागावा यासाठी राज ठाकरे यांची भेट घेतली.  राज यांनी समितीच्या शिष्टमंडळासमोरच मंत्री वर्षा गायकडवाड यांना कॉल केला. याबाबत लवकरच शिक्षण अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढणार आहे. हवं तर आपण पुन्हा त्याविषयी गायकवाड यांच्याशी चर्चा करू असं राज यांनी शिष्टमंडळला सांगितले.

शाळांमधील अवास्तव फी वाढीवर सरकारचे नियंत्रण नाही. शाळांकडून मनमानी कारभार सुरू असल्याचे शिष्टमंडळाने राज यांना सांगितले, आपण सरकारशी हात जोडून बोलू नाहीतर मग हात सोडून बोलू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Latest Marathi News Live Update : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर

SCROLL FOR NEXT