मुंबई : "बजरंगी भाईजान'सारख्या चित्रपटातून पाकिस्तानबरोबर मैत्रीचा सल्ला देणाऱ्या सलमान खानने या चित्रपटाचे चित्रिकरण भारतातच केले. एवढाच मैत्रीचा पुळका असेल, तर सलमानने पाकिस्तानलाच जावे,' अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) हिंदी चित्रपटसृष्टीच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडले. उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात काम करण्यास येथील चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांच्या संघटनेने बंदी घातली आहे. यावर सलमान खानसह काही कलाकारांनी नाराजीचा सूर लावला होता.
'पाकिस्तानमधील कलाकार दहशतवादी नाहीत,' असे वक्तव्य सलमान खानने केले होते. या वक्तव्याचा राज ठाकरे यांनी आज समाचार घेतला. राज ठाकरे म्हणाले, "कलाकार आभाळातून पडले आहेत का? कलाकारांना सीमा नसतात म्हणे! कर्नाटक-तमिळनाडूमध्ये पाण्याच्या वाटपावरून वाद झाले, तेव्हा दोन्ही राज्यांतील कलाकार रस्त्यावर उतरले होते. त्यांना त्यांच्या सीमा कळतात. ते स्वत:च्या राज्याच्या पाण्यासाठी उभे राहिले आणि यांना (हिंदी चित्रपटांतील कलाकार) स्वत:च्या देशासाठी उभे राहता येत नाही? पाकिस्तानच्या ज्या कलाकारांना यांना पुळका आहे, त्यांना खुद्द पाकिस्तानमध्ये तरी किंमत आहे का? 'पाकिस्तानचे नागरिक चांगले आहेत' असा यांचा दावा असतो. पण आमच्यासमोर त्यांचे दहशतवादीच येत असतात. सलमान खानला पाकिस्तानविषयी एवढेच प्रेम असेल, तर 'बजरंगी भाईजान'चे चित्रिकरण पाकिस्तानमध्ये जाऊन का नाही केले?''
राज ठाकरे म्हणाले..
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.