मुंबई

Rice : भात खरेदी केंद्र सुरू न केल्याने खासगी व्यापाऱ्याच्या कचाट्यात सापडतोय शेतकरी

सकाळ डिजिटल टीम

भात खरेदी केंद्र सुरू न केल्याने परिसरातील शेतकरी खासगी व्यापाऱ्याच्या कचाट्यात सापडला आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह व मुलांच्या शिक्षणासाठी मेहनतीने कमावलेला व निसर्गाच्या कोपातून वाचलेले भात खासगी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने विकावे लागत असल्याने शेतकऱ्यांना यावर्षी चांगला भात पिकूनही मेहनतीचे फळ मिलत नसल्याने व शासनाने खर्डी व उबरखांड या ठिकाणी भात खरेदी केंद्र सुरू न केल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे.

आदिवासी विकास महामंडळाने खर्डी परिसरात खरेदी केंद्र सुरू न केल्याने शेतकरी शासनाच्या विरोधात संताप व्यक्त करीत आहेत.

शंभर पाडे, ६० गावे व दहा ग्रामपंचायतींनी खर्डी परिसर जोडलेला असून येथे शेतकरी भाताचे एकमेव पीक घेतात. लहरी पावसामुळे कधी ओला; तर कधी सुका दुष्काळाचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. भाताचे कोठार समजल्या जाणाऱ्या खर्डी विभागात खासगी व्यापाऱ्यांची चंगळ सुरू असून ते शेतकऱ्यांच्या गरजेचा फायदा घेऊन कलडीमोलाने भात खरेदी करत आहेत.

त्यानंतर आपली गोदामे भरून नंतर आदिवासी विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आपला भात शासकीय दरानुसार ७/१२ ची अफरातफर करून विकत आहेत. त्यामुळे चरितार्थ आणि उत्पन्नाचे साधन असणारी भातशेती शेतकऱ्यांना नकोशी झाली असल्याचे शेतकरी दीपक घरत यांनी सांगितले.

प्रक्रिया उद्योगांचा अभाव
खर्डी परिसरात भातावर प्रक्रिया उद्योगांचा अभाव असल्याने भात जसेच्या तसे विकले जाते. लाह्या, तांदूळ व पोहे यांसारखे सहकारी उत्पादक उद्योग नसल्याने भाताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना वेठीस धरले जाते.

तसेच इथे सार्वजनिक बांधकाम विभागाची गोदामे उपलब्ध असूनही आदिवासी महामंडळ स्वतः भात खरेदी केंद्र का सुरू करीत नाही, याकडे स्थानिक राजकीय नेते व लोकप्रतिनिधी डोळेझाक करीत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT