Mumbai
Mumbai Sakal
मुंबई

बेरोजगारीत वाढ ; ऑगस्टमध्ये १५.५० लाख गेल्या नोकऱ्या

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशाचा जीडीपी (JDP), जीएसटी (GST) संकलन तसेच शेअर बाजारातही (Share Market) मोठी वाढ झाल्याने अर्थकारणाचे चक्र पुन्हा गतिमान झाल्याचे सकारात्मक चित्र निर्माण झाले होते; मात्र ऑगस्टमध्ये देशाचा बेरोजगारी (Unemployment) दर ८.३२ टक्क्यांपर्यंत वाढल्याची चिंताजनक आकडेवारी सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (Monitoring Indian Economy) (सीएमआयई) (CMIE) प्रसिद्ध केली आहे.

या आकडेवारीनूसार, ऑगस्टमध्ये तब्बल १५.५० लाख भारतीयांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. त्यामुळे जीडीपी वाढत असला, तरी ऐन कोरोनाकाळात मध्यमवर्गीयांच्या खरेदीक्षमतेवर मोठा परिणाम झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. सीएमआयईच्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये देशाचा बेरोजगारीचा दर ६.९५ टक्के होता; मात्र ऑगस्टमध्ये त्यात १.३७ टक्क्यांनी वाढ होऊन हा दर आता ८.३२ टक्क्यांपर्यंत गेला आहे. त्यातही शहरी बेराजगारीचे प्रमाण जुलैमध्ये ८.३ टक्के होते; ऑगस्टमध्ये हा दर तब्बल ९.७८ टक्क्यांवर गेला आहे.

ग्रामीण भागाला फटका

देशातील शहरांमध्ये जुलैमध्ये औपचारिक व अनौपचारिक क्षेत्रात जवळपास ३९.९३ कोटी लोकांना नोकऱ्या होत्या. ऑगस्टमध्ये ही संख्या ३९.७७ कोटीपर्यंत आली; तर ग्रामीण भागात १३ लाख नोकऱ्या कमी झाल्या. भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीदेखील चिंता व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT