डहाणू : कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने संचारबंदी कडक होत गेल्याने डहाणूतील हजारो मच्छीमार गुजरातमध्ये अडकून पडले होते. काही हजार मच्छीमारांना आतापर्यंत बोटींच्या मदतीने डहाणू बंदरात आणण्यात आहे होते. अजूनही काही खलाशी गुजरातमध्येच असून तब्बल 22 दिवसांनी 2 हजार 882 खलाशांचा चौथा जथ्था गुरुवारी (ता. 16) दुपारी तीन वाजता 20 बोटींतून डहाणू बंदरात सुखरूप उतरविण्यात आला. त्यामुळे डहाणू बंदराला यात्रेचे स्वरूप आले होते.
हे वाचलं का? : चिंताजनक : धारावीत सापडले नवे 26 रुग्ण
डहाणू, तलासरी, जव्हार, विक्रमगड आणि मोखाडा तालुक्यांतील हजारो आदिवासी दहा महिन्यांसाठी गुजरातमधील पोर बंदर, वेरावळ, मंगळूर, सौराष्ट्र आदी ठिकाणी मच्छीमार बोटींवर खलाशी म्हणून स्थलांतरित झाले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे ते गुजरातमध्येच अडकून पडले होते. त्यांना टप्प्याटप्प्याने बोटींनी डहाणू बंदरात आणण्यात येत आहे. गुरुवारी खासदार राजेंद्र गावित, नगराध्यक्ष भरत राजपूत, आमदार कॉ. विनोद निकोले, माजी नगराध्यक्ष शशिकांत बारी, नगरसेवक जगदीश राजपूत, विशाल नांदलस्कर, रमेश काकड, मिलिंद मावळे आदी बंदरावर उपस्थित होते.
हेही वाचा : लाॅकडाऊन सुरू आहे! पण तळीरामांचा हैदाेस काही थांबेना...
सर्व खलाशांची तपासणी करणार
सर्व खलाशांना कोरोना संदर्भातल्या वैद्यकीय तपासणीसाठी डहाणूच्या सेंट मेरी हायस्कूलमध्ये नेण्यात आले. तेथून त्यांना डहाणू, जव्हार, तलासरी, विक्रमगड आणि मोखाड्यामधील त्यांच्या गावागावातील घरात पोहोचविण्यात येणार आहे. त्यांच्या घरीच त्यांना विलगीकरणासाठी ठेवण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.