pali gram panchayat
pali gram panchayat 
मुंबई

पाली ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश बालके यांचे सरपंचपद रद्द

अमित गवळे

पाली : पाली ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे पद रद्द करण्यात आले आहे. सरपंच गणेश विश्वनाथ यांनी सार्वत्रिक निवडणूक सप्टेंबर 2018 मध्ये राखीव प्रवर्गातून लढवली होती. निवडून आलेल्या दिनांकापासून विहित मुदतीत त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी गुरुवारी (ता. 1) आदेश काढून त्यांचे सरपंचपद रद्द केले आहे. याबाबत पाली ग्रामपंचायत सदस्य भास्कर केशव दुर्गे व इतर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. 

ग्रामपंचायत पालीचे सरपंच गणेश बालके यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर केलेले आहे किंवा कसे, याबाबत आवश्‍यक ती पडताळणी करून अहवाल सादर करण्याबाबत तहसीलदार सुधागड यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून कळविण्यात आले होते. त्याअनुषंगाने तहसीलदार सुधागड यांनी अहवाल सादर केला आहे, की सरपंच गणेश बालके यांची जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत संपुष्टात आलेली असून त्यांनी आजपर्यंत जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. गणेश बालके हे कोळी महादेव या अनुसूचित जमातीचे नसल्याने त्यांच्या त्याबाबतचा दावा अवैध घोषित करण्यात आलेला असून त्यांना कार्यकारी दंडाधिकारी सुधागड यांनी कोळी महादेव या अनुसूचित जमातीचे निर्गमित केलेले प्रमाणपत्र हे रद्द करून जप्त करण्यात आले असल्याचे पाली तहसीलदारांनी कळवले.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (1959 चा मुंबई अधिनियम क्रमांक 3) चे कलम 10-1 (अ) नुसार गणेश बालके यांचे सरपंचपद रद्द करण्याबाबत रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. 1) आदेश दिले. 

(संपादन : वैभव गाटे)

Sarpanch of Pali Gram Panchayat Ganesh Balke Sarpanch post canceled

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT