दिघा येथील पदपथावर गाळेधारकांनी अतिक्रमण केले आहे
दिघा येथील पदपथावर गाळेधारकांनी अतिक्रमण केले आहे 
मुंबई

दिघ्यातील पदपथांवर भंगार माफियांकडून अतिक्रमण

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा परिसरातील दिघा बाबा मंदिर ते संजय गांधी नगरपर्यंतच्या रस्त्यावरील पदपथावर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणेदेखील जिकिरीचे झाले आहे. राजकीय नेत्यांच्या फलकांचा आधार घेत भंगार माफियांनी या ठिकाणच्या रस्त्यांवर अतिक्रमण करून रस्ता गिळंकृत केला आहे. राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने सर्वच गाळेधारकांनी या ठिकाणी रस्ता गिळंकृत केला आहे. ऐरोली व दिघा विभागातील हद्दीच्या वादात पदपथावर अतिक्रमण करणाऱ्या भंगार माफियांचे मात्र चांगभले झाले आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावरील संजय गांधीनगर परिसरात भंगार माफिया म्हणून ओळख असणाऱ्या एका राजकीय नेत्याने रस्त्यालगतच हॉटेल आणि आपले राजकीय जनसंपर्क कार्यालय थाटले आहे. रस्त्यालगत असणाऱ्या दुकानांवर त्याचा वरदहस्त असल्याने लाकडी वखार, मटण विक्रेते व इतर व्यावसायिकांनी बिनधास्तपणे पदपथावर अतिक्रमण केले आहे. या मार्गावरून जाण्या-येण्यासाठी नागरिकांना पदपथ शोधावे लागत आहेत; तर सर्वच दुकान व्यावसायिकांनी पदपथावर अतिक्रमण करत आपले दुकान थाटल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी देखील होते. 

राजकीय वरदहस्त असल्याने अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या व पदपथ गिळंकृत केलेल्या हॉटेल व कार्यालयावर कारवाई करण्यात येत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. संध्याकाळच्या वेळेला अनेक राजकीय कार्यकर्त्यांच्या गाड्या कार्यालयाच्या बाहेरच बेशिस्तपणे उभ्या केल्या जातात. हे कार्यकर्ते संध्याकाळच्या वेळी या ठिकाणी खुर्च्या टाकून ठाण मांडून बसलेले असतात. त्यामुळे येथून जाणाऱ्या-येणाऱ्या महिलांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. 

हद्दीवरून अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी
या संदर्भात दिघा विभाग अधिकारी प्रियांका काळसेकर यांच्याशी संपर्क साधला असता संजय गांधी नगर हा परिसर ऐरोली विभाग कार्यालयांतर्गत येत असल्याने अतिक्रमण हटवण्याची जबाबदारी ही ऐरोली विभागाची आहे, तर ऐरोलीचे विभाग अधिकारी अनंत जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ऐरोली विभाग कार्यालयाअंतर्गत हा भाग येत असल्यास तेथील अतिक्रमणावर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

ऐरोली नाक्‍यावरून दिघ्याकडे जाताना संजय गांधीनगर ते दिघा बाबा मंदिरापर्यंत रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुकानदारांनी पदपथावर अतिक्रमण केले आहे. पदपथावर अतिक्रमण केल्यामुळे नाइलाजास्त्व रस्त्यावरून पायी जावे लागते.
- राकेश म्हात्रे, नागरिक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT