भाईंदर ः बीएसयूपी योजना रखडल्याने संतप्त नागरिकांनी अायुक्त कार्यालयाला घातलेला घेराव. 
मुंबई

मिरा-भाईंदरमध्ये घरांसाठी महापालिकेला घेराव

सकाळ वृत्तसेवा

मिरा रोड ः मिरा-भाईंदर महापालिकेकडून राबवण्यात येत असलेली बीएसयूपी योजना दहा वर्षांपासून रखडल्यामुळे रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे संतापलेल्या रहिवाशांनी शुक्रवारी (ता.१३) आयुक्त कार्यालयाला घेराव घातल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. 

मिरा-भाईंदर महापालिकेने काशीमिरा येथील जनतानगर आणि काशी चर्च झोपडपट्टी येथे २००९ ला बीएसयूपी योजनेच्या कामाला सुरुवात केली; परंतु १० वर्षे उलटूनही अद्याप योजना रखडली आहे. ही योजना भ्रष्ट अधिकारी आणि राजकीय अनास्थेमुळे रखडलेली असून यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, असा रहिवाशांचा आरोप आहे. या योजनेत ४ हजार १७६ घरे होती. प्रत्यक्षात काशी गावात आठ मजल्याची एक इमारत तयार झाली असून यात दोनशेच्या आसपास राहिवाशांना घरे देण्यात आली आहेत; तर चार इमारती निधीअभावी अर्धवट अवस्थेत आहेत. 

जनतानगर, काशी चर्च येथील रहिवाशांना घरे रिकामी करण्यासाठी पालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी तीन वर्षांची वेळ दिली होती; परंतु १० वर्षे उलटूनही अद्यापपर्यंत ही योजना पूर्ण झालेली नाही आणि कधी पूर्ण होईल, याची शाश्‍वती देता येत नाही. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. येथील काही रहिवाशांना लोढा येथे; तर काहींना पिनाकोला येथील एमएमआरडीएच्या इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात घरे दिली आहेत; तर काही रहिवाशांची घोडबंदर येथील १०० फुटांच्या पत्र्याच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये व्यवस्था केली आहे. 

नागरिकांना दिलेली घरे अत्यंत लहान असून तेथे अपुऱ्या सुविधा आहेत. पाणी, कचरा, लिफ्ट अशा अनेक समस्यांमुळे आरोग्याचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. त्यामुळे संतप्त झालेले रहिवासी ‘हमारा घर हमारा अधिकार’ ही संस्था बनवून एकत्र आले आहेत. येथील रहिवाशांनी आयुक्तांची भेट घेण्यासाठी आजची वेळ घेतली होती; परंतु आयुक्त बालाजी खतगावकर पालिकेत फिरकलेच नाहीत. त्यामुळे सुमारे ५०० संतप्त रहिवाशांनी आयुक्त व महापौर कार्यालयाला घेराव घातला. या वेळी उपस्थित शहर अभियंता शिवाजी बारकुंड यांनी समस्या सोडवण्याचे आश्‍वासन दिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shalinitai Patil Passes Away: माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं मुंबईत राहत्या घरी निधन

BMC Election: मुंबईतील भाजपचा 'हा' अभेद्य किल्ला ठाकरे बंधू जिंकणार का? मारवाडी, गुजराती आणि जैन मतदारांच्या हाती निर्णय

IND vs SA. 5th T20I: भारताने जिंकली मालिका! आधी हार्दिक-तिलकने चोपलं अन् मग चक्रवर्तीने फिरकीच्या जाळ्यात द. आफ्रिकेला अडकवलं

T20 World Cup साठी संघ निवडीच्या एक दिवस आधीच शुभमन गिल टीम इंडियातून बाहेर; BCCI ने दिले अपडेट्स

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या, एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT