मुंबई

प्रवाशांचे आरोग्य विमान सेवेच्या आरोग्यापेक्षा महत्त्वाचे - सुप्रीम कोर्ट

सकाळवृत्तसेवा

मुंबई, ता. 25 : मागील दोन महिन्यांपासून बंद असलेल्या विमान सेवा सुरू करण्याबाबत आज सर्वोच्च न्यायालयाने केन्द्र सरकारला अंशतः दिलासा दिला. येत्या दहा दिवसातील एअर इंडियाच्या विमान प्रवासमध्ये मधली सीट रिकामी न ठेवण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे. मात्र सरकारसाठी प्रवाशांचे आरोग्य सर्वाधिक महत्त्वाचे असून मधली सीट रिक्त न ठेवण्याचा निर्णय अस्वस्थ करणारा आहे, असेही न्यायालयाने सुनावले आहे.

आजपासून एअर इंडियाची सेवा सुरू करण्यात येत आहे. विमानामधील मधली सीट रिकामी ठेवावी, असे बंधन केन्द्र सरकारने यापूर्वी घातले होते. मात्र सुधारित परिपत्रक काढून मधली सीट रिक्त न ठेवण्याचे स्पष्ट केले आहे. एअर इंडियाच्या अशा सोशल डिस्टन्सिंग न पाळणार्या प्रवासाला एअर इंडियाच्या काही कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने याबाबत खुलासा करण्याचे निर्देश एअर इंडियाला दिले आहेत.

तसेच जुन्या निर्णयानुसार सोशल डिस्टन्सिंग पाळून आणि मधली सीट रिक्त ठेवून सेवा सुरु करण्याचे अंतरिम निर्देश दिले आहेत. मात्र केन्द्र सरकारने या निर्णयविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठापुढे याचिकेवर आज व्हिडीओ कौन्फरन्सिंगद्वारे तातडीने सुनावणी झाली. न्यायालयाने प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयात वर्ग केले असून पुढील सुनावणीला यावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले. विमान प्रवासात ही सोशल डिस्टन्सिंग पाळायला हवे, प्रवाशांचे आरोग्य विमान सेवेच्या आरोग्यापेक्षा महत्त्वाचे आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. तसेच तूर्तास मधली सीट रिक्त न ठेवण्याची मुभा दहा दिवसांसाठी दिली आहे.

संबंधीत निर्णय तज्ज्ञांच्या मतानुसार घेण्यात आल्याचा दावा सरकारने केला आहे. परदेशी भारतीय आणि येथील परदेशी नागरिक यांना विमान सेवेद्वारे प्रवास करता येईल. अशावेळी कोणाला टाळणे योग्य ठरणार नाही, असा दावा सरकार कडून करण्यात आला. उच्च न्यायालयात ता. 5 जून रोजी सुनावणी होणार आहे.

supreme court slams government says health of citizens is more important any other thing

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

SCROLL FOR NEXT