मुंबई

राज्यातील टोल नाक्यांवर १०० मिटरनंतर टोलमुक्ती कधी ?

CD
पिवळ्या रेषेपलिकडील वाहनांना टोलमुक्ती कधी? मुंबईच्या प्रवेशद्वारावर वाहनांच्या गर्दीमुळे चालक हैराण सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ५ : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोल नाक्यांवर १०० मीटर अंतरावर पिवळी रेषा आखण्यात आली आहे. टोल नाक्यांवर त्या अंतराच्या पलीकडे वाहनांच्या रांगा लागल्यास पिवळ्या रेषेनंतरच्या वाहनांना निशुल्क सोडण्याचे आदेश टोल नाका चालकांना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने दिले आहेत; परंतु त्याची अंमलबजावणी सुद्धा होत नाही. मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोल नाक्यांवर अशाच दैनंदिन वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे राज्यात या आदेशाची अंमलबाजवणी कधी होणार, असा प्रश्न वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. राष्ट्रीय टोल नाक्यावर होणाऱ्या कोंडीतून वाहनचालकांची सुटका मिळावी, यासाठी पिवळ्या रेषेनंतरच्या वाहनांना निशुल्क सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी टोल नाक्यांवर १०० मीटरपर्यंत पिवळी रेषा सुद्धा आखण्यात आली असून, जोपर्यंत वाहनांची रांग १०० मीटरपेक्षा कमी होत नाही, तोपर्यंत त्या चालकांकडून टोल न घेताच सोडावे लागते. मात्र, राज्यातील एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक टोल नाक्यांवर या आदेशाची अद्यापही अंमलबाजवणी होत नसल्याने अवजड वाहन, वाहतूकदार आणि खासगी वाहतूकदारांना या टोल नाक्यांवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुलुंड, खारघर, वाशी, दहिसर, भिवंडी किंवा अन्य राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावर सकाळ-सायंकाळी गर्दीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. अशावेळी टोलनाक्याच्या दोन्ही बाजूंना लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. विशेष म्हणजे फास्ट टॅगच्या रांगेतही या वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात; परंतु टोल नाकाचालकांकडून पिवळ्या रेषेपलीकडील वाहनांकडूनही सर्रास टोल वसुली केली जात असल्याने वाहनचालकांकडून संताप व्यक्त होत आहे. -------- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने १०० मीटर वाहनांच्या रांगा असल्यास संबंधित वाहनांना निशुल्क सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहतूकदारांना दिलासा मिळणार आहे. याची अंमलबजावणी राज्य सरकारनेही करावी, जेणेकरून राज्यातील वाहतूकदार आणि खासगी वाहनधारकांना कोंडीतून मुक्ती मिळेल. - बाबा शिंदे, अध्यक्ष, राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

SCROLL FOR NEXT