सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १९ : शेतकरी कामगार पक्ष हा शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विराचारांचा वारसा घेऊन सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणारा पक्ष आहे. शेकापचा हा समृद्ध वारसा कोणीही मोडीत काढू शकणार नाही. कितीही संकटे आली तरी शेकाप पुन्हा त्याच ताकदीने उभा राहिला आहे आणि तो पुन्हा तीच ताकद आगामी निवडणुकांमध्ये दाखवून देईल, असा विश्वास शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्हा पक्षसंघटना आणि विविध जनआघाड्यांचा पदाधिकारी निवड मेळावा रविवारी (ता. १८) सायंकाळी पेझारी पटांगणात आयोजित करण्यात आला होता. या वेळी मार्गदर्शन करताना जयंत पाटील बोलत होते. सत्ता असो वा नसो, निष्ठावंतांची फळी निर्माण करून आगामी निवडणुकांमध्ये विजय खेचून आणण्याचे काम प्रत्येक पदाधिकारी-कार्यकर्त्याला करायचे आहे. पक्ष बदलणाऱ्यांना धडा शिकवायचा आहे. सध्या देशासह राज्याची परिस्थिती भयावह आहे. पीक विमा बंद आहे. बहीणही आता लाडकी राहिलेली नाही. त्यामुळे जनतेचे प्रश्न समोर ठेवून लढण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले.
शेकापने पदाधिकारी निवडीत तरुण नेतृत्वाला संधी दिली आहे. मेळाव्याला शेकाप ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, द्वारकानाथ नाईक, माजी आमदार बाळाराम पाटील, प्रा. एस. व्ही. जाधव, ॲड. राजेंद्र कोरडे, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप राज्य कामगार आघाडीचे प्रमुख प्रदीप नाईक, शेकाप राज्य खजिनदार अतुल म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, अलिबाग नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
----
फोटो समीर मालोदे यांनी पाठवलेले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.