मुंबई

दरडप्रवण सुभाषनगरमधील ३७ कुटूंबांचे स्थलांतर

CD

खोपोली, ता. २६ (बातमीदार) ः सुभाषनगर वसाहतीला दरडीचा धोका असून अनेक वर्षांपासून रहिवासी जीव मुठीत घेउन राहत आहेत. इर्शाळवाडी दुर्घटनेची पुनरावृत्‌ती टळावी, म्‍हणून प्रशासन सज्‍ज झाले असून दरडप्रवण क्षेत्राची पाहणी करण्यात येत आहे. तसेच जो भाग धोकादायक आहे, तेथील नागरिकांचे स्‍थलांतर करण्यात येत आहे. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सुभाषनगर ३७ कुटुंबांचे मस्को कॉलनीतील इमारतीत स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच काजूवाडीतील आठ कुटुंबे आपल्या नातेवाइकांकडे राहण्यासाठी गेले आहेत.
चौक इर्शाळवाडी-ठाकूरवाडी आदिवासी पाड्यावर डोंगर कोसळल्याने अनेक कुटुंबे दरडीखाली गाडली गेली आहेत. खोपोली नगरपालिका क्षेत्रातील सुभाषनगर आणि काजूवाडी येथे दरडीचा धोका कायम आहे. येथील नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले असून जवळचे गणेश मंदिर तसेच वासरंग शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे.

कंपनीकडून जागा उपलब्‍ध
मस्को कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केल्यावर जागा उपलब्ध झाली. नगरपरिषदेने युद्धपातळीवर वीज, पाणी, स्वच्छता करीत इमारतीची डागडुजी केली आहे. त्यानंतर सुभाषनगरमधील ३७ कुटुंबीयांचे स्थलांतर केले आहे. प्रशासनाच्या आवाहनानंतर काजूवाडीतील कुटुंबेही नातेवाइकांकडे राहण्यासाठी जात आहेत.

सुभाषनगर आणि काजूवाडीतील अतिधोकादायक कुटुंबांना स्थलांतर करण्यासाठी नगरपरिषद दोन महिन्यांपासून प्रयत्न करीत आहे तसेच दरड साक्षरतेवरही भर दिला जात आहे. दरडप्रवण भागातील रहिवाशांना नोटिसा बजावण्यात आल्‍या आहेत. नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यावर मस्को कंपनीच्या इमारतीत चार महिने राहण्याची सोय केली आहे. उर्वरित कुटुंबांनाही स्थलांतर करण्यासाठी नगरपरिषद प्रयत्नशील आहे.
अनुप दुरे, मुख्याधिकारी, खोपोली

खोपोली : सुभाषनगरमधील अतिधोकादायक घरांतील नागरिकांचे स्‍थलांतर करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Latest Maharashtra News Live Updates: गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ; नाशिककरांना सतर्कतेचा इशारा

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

Ashadhi Wari 2025: विठूनामाने ‘प्रवरा संकुल’चे मैदान दुमदुमले; अश्‍वरिंगण सोहळा उत्साहात, १५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

Raju Shetti: शेतकऱ्यांच्या थडग्यावर विकासाचे मनोरे नको: राजू शेट्टी; 'शक्तिपीठ'मुळे ५५ हजार शेतकरी देशोधडीला लागणार

SCROLL FOR NEXT