सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये उपलब्ध २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी अर्ज आले आहेत. एक लाख एक हजार जागा उपलब्ध असताना राज्यभरातून तीन लाखांहून अधिक पालकांनी अर्ज केले आहेत. दरम्यान, प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आरटीई प्रवेशासाठी १७ मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत दिली होती; मात्र अखेरच्या दिवशी असंख्य पालकांना अर्ज करताना आलेल्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन संचालनालयाने प्रवेशासाठीची मुदत २५ मार्चपर्यंत वाढवली आहे.
आरटीई प्रवेशासाठी राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या ८,८२८ शाळांमध्ये ०१,०१,९६९ जागा उपलब्ध आहेत. या जागांवर प्रवेशासाठी १७ मार्चपर्यंत राज्यभरातून तब्बल तीन लाख १४ हजार ७३१ प्रवेश अर्ज आले आहेत. दरम्यान, २५ मार्चनंतर अर्ज करण्यास कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही, असे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्यात आरटीईच्या प्रवेशासाठी सर्वाधिक अर्ज पुणे विभागातून आले आहेत.
आरटीई प्रवेश
जिल्हा जागा अर्ज
पुणे १५,६५५ ६८,१९२
नागपूर ६,५७७ ३३,१६५
ठाणे १२,२७८ २७,६६५
मुंबई ६,५६९ १५,७८७
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.