रात्रशाळांतील दहावीची पोरं हुशार
२० शाळांचा १०० टक्के, १० ठिकाणी ९० टक्के निकाल
मुंबई, ता. १५ ः सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक आदी कारणांमुळे मध्येच शिक्षण सोडलेल्या शेकडो गरजूंना दहावी-बारावीचे शिक्षा उपलब्ध करून देणाऱ्या मुंबईतील रात्र शाळांनी यंदा दहावीच्या निकालात मोठी आघाडी घेतली आहे. मुंबईतील तब्बल १०२ शाळांपैकी मासूम संस्थेच्या अंतर्गत असलेल्या २० शाळांचा निकाल १०० टक्के इतका लागला आहे, तर १० शाळांचा निकाल हा ९० टक्के आणि त्याहून अधिक लागला आहे.
राज्यात आजमितीला राज्यात १४५ रात्रशाळा कार्यरत असून, त्यातील मुंबईत १२० शाळा कार्यरत आहेत. यात ज्यांचे शिक्षण अपुरे राहिले आहे, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या शाळा महत्त्वाच्या ठरल्या आहेत. मुंबईसह राज्यात मासूम संस्थेमार्फत सध्या १०२ रात्र शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यापासून ते तज्ज्ञ शिक्षक आदी उपलब्ध करून दिले जातात. मागील १७ वर्षांपासून हे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. एकट्या मुंबईत २० शाळांचा निकाल १०० टक्के लावण्यात मासूमची आणि रात्रशाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक आदींचीही भूमिका महत्त्वाची ठरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.