मुंबई

नॅशनल पार्कातील रहिवाशांच्‍या स्थलांतराचा मार्ग मोकळा

CD

नॅशनल पार्कातील रहिवाशांच्‍या स्थलांतराचा मार्ग मोकळा
राज्‍य सरकारची अधिसूचना जारी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ ः बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (नॅशनल पार्क) हद्दीत राहणाऱ्या आदिवासी आणि अतिक्रमण करणाऱ्या कुटुंबांना अविकसित क्षेत्र (नो डेव्हलपमेंट झोन) म्हणून निश्चित केलेल्या जमिनीवर पुनर्वसन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरी विकास विभागाने विकास नियंत्रण नियमावली २०३४ अंतर्गत नियम ३४ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील रहिवाशांना अविकसित क्षेत्र जमिनीवर स्थलांतरित करता येणार असून, याबाबतची अधिसूचना जारी करत हरकती आणि सूचना मागवल्या आहेत.
नगरविकास विभागाने प्रस्तावित सुधारणांबाबत एक अधिसूचना जारी करत ३० दिवसांच्या आत नागरिकांकडून हरकती आणि सूचनाही मागवल्या आहेत. या अधिसूचनेत म्हटले आहे की, राज्याने यापूर्वी अविकसित क्षेत्र जमिनीवर आयटी कंपन्यांच्या कार्यालयांना परवानगी दिली होती. नॅशनल पार्कातील रहिवाशांना पुनर्वसन करण्यासाठी शहरात मोठ्या, रिकाम्या जमिनी उपलब्ध नसल्याने त्यांचे पुनर्वसन अशाच प्रकारे केले जाईल.
१९९७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने नॅशनल पार्क हद्दीत राहणाऱ्या सर्व झोपडपट्टीवासीयांना उद्यानाच्या सीमेबाहेर स्थलांतरित करण्याचे निर्देश दिले होते, परंतु राजकीय दबावामुळे राज्य सरकार आणि वन विभाग त्यांना स्थलांतरित करू शकले नाहीत.
वन विभागाच्या मते, उद्यानाच्या काठावर पसरलेल्या ४३ वस्त्यांमध्ये सुमारे २००० आदिवासी कुटुंबे राहतात. आणखी २४,९५१ कुटुंबांनी उद्यानाच्या विविध भागांवर अतिक्रमण केले आहे आणि ते स्थलांतरासाठी पात्र आहेत, असे शहरी विकास विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

पर्यावरणीय संतुलन राखण्याचे काम
अधिसूचनेत असे म्हटले आहे की, नॅशनल पार्क हे मुंबई आणि ठाण्यातील पर्यावरणीय संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. उद्यानाच्या सभोवतालचे हरित क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून वर्गीकृत केले आहे. त्‍यामुळे आदिवासी कुटुंबे आणि अतिक्रमण करणाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्याचा वापर करता येत नाही, असे त्यात म्हटले आहे. फेब्रुवारीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, पुनर्वसनासाठी अशी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी धोरणात बदल करण्याची सूचना करण्यात आली. यासाठी विकास नियंत्रण नियमावली २०३४ मध्ये नवीन तरतुदी जोडता येतील, असे सुचवणारा अहवाल एका समितीने सरकारला सादर केला होता, असा अधिसूचनेत उल्‍लेख आहे.
..................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT