मुंबई

चिथावणीखोर भाषणांत महाराष्ट्र तिसरा

CD

चिथावणीखोर भाषणांत महाराष्ट्र तिसरा
वर्षभरात ६०२ द्वेष पसरवणाऱ्या घटनांची नोंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ ः मागील वर्षभरात देशभरात द्वेषपूर्ण आणि चिथावणीखोर भाषण करून धार्मिक भावना दुखावण्याच्या आणि समाजात तेढ निर्माण करण्याच्या ६०२ घटनांची नोंद झाली. देशातील एकूण घटनांचा विचार केल्यास, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक घटना घडल्याची बाब असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स (एपीसीआर) स्वयंसेवी संस्थेच्या अहवालातून पुढे आली आहे. विशेष म्हणजे, द्वेषपूर्ण भाषण देणाऱ्यांमध्ये पंतप्रधानांसह भाजपच्या अनेक मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे.
धार्मिक द्वेषातून केलेली भाषणे, विविध घटनांबाबत वृत्तपत्र आणि डिजिटल माध्यम आणि माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीच्या आधारे हा अहवाल संस्थेने तयार केला आहे. देशभरात घडलेल्या ६०२ द्वेषपूर्ण घटनांपैकी ८१ घटनांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. २६७ घटनांमध्ये उजव्या विचारसरणीच्या संघटनांचा समावेश होता. त्यामुळे झालेल्या हिंसाचारात २९ जणांचा मृत्यू झाला असून सर्व मृत हे मुस्लिम समुदायाचे असल्याचा दावा संस्थेने केला आहे.
---
द्वेषपूर्ण घटनांमध्ये काय घडले?
४२.२ टक्के
अत्याचारासाठी प्रवृत्त करणे
---
१८.५ टक्के
शारीरिक हिंसाचार
---
१३.१ टक्के
जमावाकडून हल्ले
---
११ टक्के
मालमत्तेचे नुकसान
----
यूपीत अल्पसंख्याकांवर सर्वाधिक अत्याचार
वर्षभरात देशात अल्पसंख्याकांवर अत्याचार करणाऱ्या ३९८ घटना घडल्या. त्यापैकी सर्वाधिक ११९ घटना उत्तर प्रदेशात घडल्या. हिंसाचाराच्या सर्वाधिक घटनांमध्ये उत्तर प्रदेशात अग्रेसर असून, मध्य प्रदेश १७, तर छत्तीसगड ११ घटनांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ही सर्व राज्ये भाजपशासित आहेत.
...
कुठे कोणी घडवल्या घटना?
राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून - १०९
सार्वजनिक मेळावे, रॅली किंवा बैठकांवेळी - २८८
संसद/विधानसभा अधिवेशनावेळी - सात
ऑनलाइन माध्यमांवरील चर्चेवेळी - २३
पत्रकार परिषद किंवा मुलाखतीदरम्यान - २७
राजकीय नेते जबाबदार असलेल्या घटना - १३९
----
दलितांवरील अत्याचाराविरोधात ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवले जातात. आदिवासींवरील हिंसाचार रोखण्यासाठी कायदेशीर तरतुदी आहेत; परंतु अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले, अत्याचार किंवा द्वेषपूर्ण घटनांसाठी विशेष कायदेशीर तरतूद नाही. राजकीय संस्कृतीच्या नावाखाली अल्पसंख्याकांना दडपण्याचा प्रयत्न होत असून हे देशासाठी घातक आहे
- ॲड. सुरेश माने, राष्ट्रीय अध्यक्ष (बीआरएसपी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishi Sunak : ब्रिटनचे माजी पंतप्रधान करणार नोकरी, जिथं समर ट्रेनी होते तिथंच बनले वरिष्ठ सल्लागार; किती वेतन?

150 Years Of BSE: बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला 150 वर्षे पूर्ण; आशियातील पहिला शेअर बाजार कोणी सुरु केला होता?

Guru Purnima 2025: गुरुपौर्णिमेचा ऋषी व्यास आणि गौतम बुद्धांशी काय आहे संबंध? जाणून घ्या सविस्तर

Vidarbha Rain : विदर्भात दुसऱ्या दिवशीही पावसाची रिपरिप; भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक, पावसाचे तीन बळी

Sharad Pawar : शिक्षकांना पावसात आंदोलन का करावे लागते? न्यायाची जबाबदारी टाळता येणार नाही; शरद पवार यांचे सरकारला खडे बोल

SCROLL FOR NEXT