शौचालयांचा ३० वर्षांचा करार रद्द करा
लोढा यांचे पालिका आयुक्तांना पत्र
मुंबई, ता. ११ : शौचालयांच्या कंत्राटासाठी मुंबई महापालिकेचा ३० वर्षांचा करार जाचक आहे. त्यामुळे नागरिकांना सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. हे करार रद्द करून नव्याने प्रक्रिया राबवावी, अशी सूचना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता तथा मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.
लोढा यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना यासंदर्भात पत्रही लिहिले आहे. पालिकेच्या एफ\नॉर्थ विभागात आयोजित जनता दरबारात अनेक नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. या वेळी आमदार प्रसाद लाड आणि कॅप्टन तमिळ सेल्वन उपस्थित होते. या जनता दरबारात नागरिकांनी शौचालयांच्या बाबतीत अनेक अडचणींचा पाढा वाचला. शौचालयांचा ३० वर्षांचा करार असल्याने कंत्राटदार मनमानी पद्धतीने शौचालये चालवतो. तसेच कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्याचे नागरिकांनी या वेळी सांगितले.
अनेक ठिकाणी गळके छत, अस्वच्छ शौचालये, नादुरुस्त दरवाजे तसेच दिव्यांचीही सोय नसल्याचे नागरिकांनी सांगितले. लोढा यांनी यासंदर्भात महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अरुण क्षीरसागर यांना त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.