सायबर फसवणुकीतील
३०० कोटी वाचविले!
पोलिस आयुक्त भारती यांचा दावा
मुंबई, ता. ११ ः गेल्या दोन वर्षांत मुंबईच्या सायबर विभागाने फसवणुकीतील तब्बल ३०० कोटी रुपये भामट्यांच्या खिशात जाण्यापासून रोखल्याचा दावा पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी केला.
आयुक्तपदी नियुक्त झाल्यानंतर प्रथमच भारती यांनी माध्यम प्रतिनिधींशी अनौपचारिक गप्पा मारल्या. दररोज सायबर फसवणुकीशी संबंधित सरासरी दोन हजारांहून अधिक कॉल सायबर विभागाला येतात. दहशतवादासोबत सायबर गुन्हेगारी, महिला सुरक्षा, शहरी नक्षलवाद, वाहतूक व्यवस्था, अमली पदार्थांची तस्करी आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था राखणे ही प्राथमिकता असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. त्यासाठी योग्य त्या उपाययोजना, धडक कारवाई, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, गणेशोत्सवासह कोणत्याही सार्वजनिक सण उत्सवात डीजे वाजविण्यास न्यायालयाच्या आदेशानुसार बंदी आहे. या आदेशाची पोलिस दलाकडून अंमलबजावणी केली जात असल्याचे भारती यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.