समुद्रकिनारे झाले चकाचक
९५२.५ मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : नुकत्याच झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर जमा झालेला प्रचंड कचरा महापालिकेने मोठ्या प्रमाणावर हटविला आहे. स्वच्छता मोहिमेद्वारे १५ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट २०२५ या कालावधीत गिरगाव स्वराज्यभूमी, दादर, माहीम, जुहू, वेसावे, मढ-मार्वे आणि गोराई या समुद्रकिनाऱ्यांवरून तब्बल ९५२.५ मेट्रिक टन उचलण्यात आला.
या मोहिमेत ३८० कर्मचाऱ्यांनी सहा यंत्रांच्या सहाय्याने दिवस-रात्र अथक परिश्रम घेऊन आणि किनारे पूर्ववत स्वच्छ केले. १९ आणि २० ऑगस्ट रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसानंतर किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झाला होता. तातडीने उपाययोजना करत महापालिकेने आयुक्त भूषण गगराणी यांच्या आदेशानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने २४ तास राबविलेल्या प्रयत्नांमुळे किनाऱ्यांवरचे स्वच्छ रूप पुन्हा परतले आहे. यामुळे स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांना आता किनारे पूर्वीप्रमाणे स्वच्छ आणि आकर्षक दिसणार आहेत.
कोणत्या समुद्रकिनाऱ्यावरील किती कचरा हटविला?
स्वराज्यभूमी (गिरगाव) : २३ मेट्रिक टन
दादर-माहीम : ३०० मेट्रिक टन
वेसावे (वर्सोवा) : २०० मेट्रिक टन
जुहू : ३७५ मेट्रिक टन
मढ-मार्वे : ३४.५ मेट्रिक टन
गोराई : २० मेट्रिक टन
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.