‘वंदे मातरम्’ गीताच्या बोधचिन्हाचे
मुख्यमंत्र्यांकडून अनावरण
मुंबई, ता. ३० : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात सार्ध शताब्दी महोत्सवाच्या ‘वंदे मातरम्’ गीताच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. देशभक्ती आणि राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असलेल्या ‘वंदे मातरम्’ गीताला यावर्षी ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या अनुषंगाने कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा व सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांच्या संयुक्त संकल्पनेतून राज्यात सार्ध शताब्दी महोत्सव साजरा करण्यात येत आहे.
राज्यभरात सार्ध शताब्दी महोत्सव समितीच्या माध्यमाने देशभक्तीवर विविध कार्यक्रम होणार असून, यात प्रामुख्याने ‘वंदे मातरम्’ गीताचे प्रत्येक तालुक्यात समूहगान होणार आहे. ‘वंदे मातरम्’ बोधचिन्हाच्या अनावरणप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, कामगार मंत्री आकाश फुंडकर, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, उच्च व तंत्रशिक्षण विभाग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह कौशल्य विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मा उपस्थित होत्या.
देशभक्ती जागृत करणाऱ्या सार्ध शताब्दी महोत्सवात सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन मंत्री लोढा आणि शेलार यांनी जनतेला केले आहे. राज्यातील कौशल्य विद्यापीठ, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. तसेच सांस्कृतिक विभागाकडूनही राज्यातील ग्रामीण भागातही सार्ध शताब्धी महोत्सव साजरा होईल, अशी माहितीही लोढा यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.