गर्दीला आळा घालण्यासाठी फलाट तिकीट विक्री बंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : दिवाळी आणि छटपूजेच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतात जाणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या पूर्ण क्षमतेने भरत आहेत. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पश्चिम रेल्वेने १५ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान काही प्रमुख स्थानकांवर फलाट तिकीट विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले, ‘हा निर्णय फलाटावरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि प्रवाशांची सोय व सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी घेण्यात आला आहे. या काळात वांद्रे टर्मिनस, वापी, उधना आणि सूरत स्थानकांवर फलाट तिकीट विक्री बंद राहील. त्याचबरोबर वरिष्ठ नागरिक, महिला प्रवासी, दिव्यांग, निरक्षर किंवा विशेष काळजीची गरज असलेल्या प्रवाशांना मदत करणाऱ्या व्यक्तींना मुभा दिली जाईल, जेणेकरून त्यांना प्रवासात अडचण होणार नाही. प्रवाशांनी आपला प्रवास नियोजनपूर्वक ठरवा आणि उत्सवाच्या काळात सुरक्षा व गर्दी व्यवस्थापनाच्या दृष्टीने तिकीट बंदीचे पालन करून रेल्वे कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. दरम्यान, पश्चिम रेल्वेनंतर आता मध्य रेल्वेदेखील काही प्रमुख स्थानकांवर फलाट तिकीट विक्रीवर बंदी घालण्याचा विचार करीत आहे. त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.