मुंबई

बेशिस्त रिक्षाचालकांकडून लाखोंचा दंड वसूल

CD

कल्याण, ता. ५ (बातमीदार) ः बेशिस्त रिक्षाचालकांवर कल्याण आरटीओच्या पथकाने कारवाई करत सरत्या वर्षात लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे. एकूण ५५ हजार ७५ रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. यातून १२ लाख ५६ हजार ९७७ रुपयांचा दंड वसूल झाला आहे. कल्याण डोंबिवली शहरात ३० हजारांहून अधिक रिक्षांवर कारवाई झाली.

रिक्षा प्रवासाचे भाडे मीटरने आकारले पाहिजे; मात्र रिक्षाचालक आणि त्यांचे नेते, संघटना नियम धाब्यावर बसवून शहरात व्यवसाय करतात. कल्याण आरटीओमार्फत बैठका घेऊन रिक्षाचालकांनी प्रवासी वर्गाशी सौजन्याने वागावे, प्रवासी वर्गाने मीटर पद्धतीने प्रवास मागितल्यास त्यांना सेवा देणे रिक्षाचालकाला बंधनकारक आहे. तरी रिक्षाचालक सेवा देत नसल्याचे कल्याण आरटीओच्या कारवाईमध्ये उघड झाले आहे. सन २०२० आणि २०२१ हा कालावधी कोरोना महामारीत गेला; मात्र परिस्थिती स्थिर झाल्यानंतर कल्याण आरटीओच्या विशेष पथकाने बेशिस्त रिक्षाचालकांच्या विरोधात कारवाई केली आहे. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत केलेल्या कारवाईमध्ये ५८७ बेशिस्त रिक्षाचालकाकडून सुमारे ६ लाख ५५ हजार १५० रुपये दंड वसूल करण्यात आला. १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत केलेल्या कारवाईमध्ये ९५७ बेशिस्त रिक्षाचालकाकडून सुमारे १० लाख ५ हजार १५० रुपये दंड वसूल करण्यात आला. १ एप्रिल २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत केलेल्या कारवाईमध्ये १७९० बेशिस्त रिक्षाचालकाकडून सुमारे १९ लाख ९० हजार ७५० रुपये दंड वसूल करण्यात आला.
--------
रिक्षाचालकांनी व्यवसाय करताना सोबत कागदपत्रे ठेवावीत. नियमांचे पालन करताना प्रवासी वर्गाशी सौजन्याने वागा, असे आम्ही आवाहन नेहमीच करतो. बेशिस्त वागणाऱ्यांच्या विरोधात कारवाई आगामी काळात सुरू राहणार आहे.
- विनोद साळवी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Labour Day : 1 मे ला कामगार दिवस का म्हटले जाते? काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर

रोहित शर्मा-विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० ला ठोकणार रामराम, 2024 चे वर्ल्डकप शेवटचे- रिपोर्ट

शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी! पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी ऑगस्टपर्यंत मुदत; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सवलत, पण शेतकऱ्यांची संमती पुनर्गठन आवश्यक

Maharashtra Day 2024: महाराष्ट्र दिनानिमित्त द्या खास अंदाजात मराठमोळ्या शुभेच्छा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT