मुंबई

थंडीमुळे भाज्यांची दरवाढ

CD

डोंबिवली, ता. २८ (बातमीदार) : वाढत्या थंडीमुळे भाज्यांचे दर प्रचंड वाढले आहेत. गेल्या काही दिवसांत थंडी वाढल्याने थंडीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या भाज्याही खराब झाल्या आहेत. त्यामुळे डोंबिवलीच्या बाजारपेठेमध्ये भाज्यांची आवक कमी झाली आहे. भाज्यांचा पुरवठा करणाऱ्या नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर व इतर जिल्ह्यांमध्ये पडलेल्या थंडीमुळे भाज्यांसह पिकांचेही नुकसान झाले आहे. शिवाय शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुरवठा कमी, मागणी जास्त अशी परिस्थिती झाल्याचे चित्र आहे. वाल, गवार, घेवडा, शेवग्याच्या शेंगा, वाटाणा, भेंडी, शिमला मिरची अशा सर्वच भाज्यांच्‍या दरात मोठी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात भाज्यांचे दर हे २५ ते ४० रुपयांनी वाढले असून, किरकोळ बाजारात ६० ते ८० रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात शेवग्याच्या शेंगा १२० ते १५० रुपयांपर्यंत विकल्‍या जात आहेत; तर गवार ८० ते ९० रुपये प्रतिकिलो रुपयांनी विकली जात आहे. वाल ६० ते ८० रुपयांनी विकले जात आहेत. शिमला मिरची ६५ रुपये प्रतिकिलो विकली जात आहे. भेंडी ५० रुपये प्रतिकिलो विकली जात असून, फ्लॉवर ६५ ते ७० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. आवक वाढल्याने भाज्यांचे दर येत्‍या काळात कमी होऊ शकतात, असे भाजी विक्रेता लकी मेहता यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Sakal Podcast : मावळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी

SCROLL FOR NEXT