मुंबई

जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी कटीबद्ध

CD

पालघर, ता. २९ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी व जिल्ह्यासाठी अधिकाधिक निधी दिला जाईल, असे आश्वासन केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिले. पालघर येथील टेंभोडे येथे आयोजित केलेल्या श्री पद्मनाभ स्वामी शिष्य संप्रदाय श्री सद्गुरु पद्मनाचार्य स्वामी महाराजांच्या १११ व्या संजीवनी समाधी महोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमासाठी मंत्री नाईक आले होते. याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार राजेंद्र गावित, आमदार सुनील भुसारा, आमदार राजेश पाटील, आमदार श्रीनिवास वनगा आदी मान्यवर उपस्थित होते.
पर्यटन व्यवसायामुळे मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होत असून देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आपले मंत्रालय प्रयत्न करीत असल्याचे मंत्री नाईक यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी आपण प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे पाठवावा. त्यांच्याकडून केंद्राकडे प्रस्ताव आल्यानंतर आपल्या जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त पर्यटन विकासासाठी निधी दिला जाईल, असेही नाईक यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि राज्यमंत्री कपिल पाटील पालघर येथील टेंभोडे सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामी महाराज यांच्या १११ व्या संजीवन समाधी महोत्सव या कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्या हस्ते भक्तनिवास मोरेश्वर पाटील सभागृहाचे उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी खासदार राजेंद्र गावित यांनी केळवे, शिरगाव, सातपाटी, डहाणू, चिंचणी, बोर्डी या निसर्गरम्य किनाऱ्यावर गोव्याच्या धर्तीवर पर्यटन विकास निर्माण करण्यासाठी मदतीचे आवाहन पर्यटन मंत्र्यांना त्यांनी केले. या वेळी आमदार राजेश पाटील, आमदार सुनील भुसारा, श्रीनिवास वनगा, नगराध्यक्ष डॉ. उज्ज्वला काळे व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम आदींनी मनोगत व्यक्त केले.

-----------------
स्थलांतर थांबवण्यासाठी प्रयत्नशील
रोजगाराच्या शोधात होणारे स्थलांतर थांबवण्यासाठी शहराच्या धर्तीवर गावांचा विकास करण्यासाठी पंचायत राज्य मंत्रालय काम करीत आहे. त्या दृष्टीने १७ शाश्वत विकास उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये शुद्ध पाणी, शिक्षण, आरोग्य, रोजगाराची संधी, स्वच्छता, पर्यावरण आदींचा समावेश असून केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांच्या आधारे गावामध्ये सुधारणा करण्याची उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. गावातील नागरिकांचे स्थलांतर रोखल्यास शहरातील सुविधांवर ताण येणार नाही, असे राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT