मुंबई, ता. १२ : साईनगर शिर्डी - मुंबई ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसमध्ये दुसऱ्याच दिवशी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली. शिर्डीहून आलेल्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचे दरवाजे न उघडल्याने प्रवाशांना ठाणे आणि दादर रेल्वेस्थानकावर गार्ड केबिनमधून उतरण्याची वेळ आली. या संदर्भातील व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल झाला असून ही घटना कशी घडली, याबाबत रेल्वेकडून अधिकृत माहिती समोर आली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १०) मुंबई-साईनगर शिर्डी आणि मुंबई-सोलापूर ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचे उद्घाटन झाले. त्यानंतर रविवारी शिर्डीहून सायंकाळी ५ वाजून २५ मिनिटांने शिर्डीमधून निघालेली रात्री १० वाजून ०५ मिनिटांनी ठाण्याला पोहोचल्यानंतर गाडीचे दरवाजे न उघडल्याने प्रवाशांचा आरडाओरडा सुरू झालेला होता. त्यानंतर आरपीएफच्या जवानांनी प्रवाशांना गार्ड केबिनमधून खाली उतरवण्यात आले. त्यानंतर रात्री १०.२८ वाजता दादर स्थानकावरही या दरवाजे न उघडले नाही. या संदर्भात एक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला असून ही घटना कशामुळे घडली, याबद्दल रेल्वेकडून अधिकृत समोर आली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.