मुंबई

घणसोलीत पाण्यासाठी आंदोलन

CD

तुर्भे, ता.२१ (बातमीदार): घणसोली विभागात सात आठ दिवसांपासून पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. याबाबत वारंवार तक्रारी करून देखील प्रशासन कुठलीच दखल घेत नसल्याने मंगळवारी (ता.२१) आक्रमक झालेल्या रहिवाशांनी विभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन करत अभियंत्यांविरोधात कारवाईची मागणी केली.
स्वतःचे मालकीचे धरण असलेल्या नवी मुंबई महापालिका शहरवासीयांना २४ तास पाणी पुरवठा करत असल्याचा दावा नेहमीच करत असते. मात्र, ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’, अशी अवस्था सध्या घणसोलीवासियांची झाली आहे. कारण सात आठ दिवसांपासून घणसोली विभागातील अनंत नगर, शंकरबुवा वाडी, म्हात्रे आळी परिसरात टॅंकर आणि विकतच्या पाण्याचा आधार घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. तसेच पाणी पुरवठ्यातील अनियमितपणामुळे महिला वर्गाला विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, याबाबत मनपाकडे वारंवार तक्रारी देखील करण्यात आल्या आहेत. पण अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने येथील संतप्त झालेल्या रहिवाशांनी विभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन करत अभियंत्यांना हटवण्याची मागणी केली. तसेच येत्या दोन दिवसात पुरवठा पूर्ववत झाला नाहीतर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT