मुंबई

रेल्वे रुळावर जिवाची बाजी

CD

जुईनगर, ता. २८ (बातमीदार) ः सानपाडा येथील कारशेडमध्ये ये-जा करणाऱ्या रेल्वे मार्गावर जुईनगर-सानपाडा येथे रस्ता मार्ग आहे. या ठिकाणी सातत्याने अपघातांच्या घटना घडत असल्यामुळे फाटक बसवण्यात आले आहे. मात्र, महिन्याभरापासून जुईनगर स्टेशनच्या बाजूला असलेले फाटक तांत्रिक बिघाडामुळे बंद आहे; तर जुईनगर-नेरूळच्या दिशेकडील फाटक मात्र चालू असल्यामुळे घरी परतण्याच्या घाईतून रूळ ओलांडण्यासाठी जिवाची बाजी लावली जात आहे.
सानपाडा येथील कारशेडकडे जाणाऱ्या रेल्वेच्या मार्गावरच जुईनगर -सानपाडा दरम्यान रस्ता मार्ग आहे. या ठिकाणी सातत्याने होत असलेल्या अपघातांच्या घटनांमुळे रेल्वेकडून फाटक बसवण्यात आले आहे. अनेक वेळा कारशेडच्या दिशेने रेल्वे येत असताना काही अतिउत्साही वाहनचालकांकडून रूळ ओलांडण्याचे प्रयत्न झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी येथे फाटक बसवण्यात आले आहे. मात्र, गेल्या महिन्याभरापासून जुईनगर स्टेशनच्या बाजूला असलेले फाटक काही तांत्रिक बिघाडामुळे बंद अवस्थेत आहे. त्यामुळे कामावर किंवा घरी परतणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी प्रवाशांची होत असलेली घाईमुळे अपघात होण्याची शक्यता जात आहे. रेल्वे प्रशासनसोबत संपर्क केला असता संपर्क झाला नाही.
---------------------------------
अपघातांची मुख्य कारणे ः
- गेल्या पाच वर्षांत या ठिकाणी रेल्वेची कार, रिक्षा तसेच बसला धडक असे छोटे-मोठे अपघात झाले आहेत; तर अनेक वेळा दुचाकीस्वारांचा जीवही थोडक्यात बचावला आहे. त्यामुळे सातत्याने घडणाऱ्या अशा अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वेने एक सुरक्षारक्षक नेमला. मात्र, प्रवासी या सुरक्षारक्षकाला जुमानत नसल्याचे चित्र आहे.
- रेल्वे रुळालगतच्या झाडीमुळे तसेच वळणामुळे रेल्वे येत असल्याचे सहज दिसत नाही; तर काही अंतरावर रेल्वे आल्यावर हॉर्नमुळे अनेकदा वाहनांवरील तोल सुटण्याचे प्रकारही होत आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूने कर्मचारी नेमण्याची गरज आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष मोठ्या अपघाताला निमित्त ठरण्याची शक्यता आहे.
़़़ः---------------------------------
येथे छोटे मोठे अपघात झाले आहेत. याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत असून फाटक सुस्थितीत असणे गरजेचे आहे.
-अजय पवार, रेल्वे प्रवासी
----------------------------
सानपाडा जुईनगर स्टेशनच्या बाजूचे फाटक नादुरुस्त असल्यामुळे एखादा अपघात होऊ शकतो. अनेक वेळा रेल्वे जात असताना लहान मुले, तरुण घाईघाईने मार्ग ओलांडतात.
-मयुरी कारंडे, प्रवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT