मुंबई

पाण्यासाठी दीड किलोमीटरची पायपीट

CD

तुर्भे, ता. १४ (बातमीदार) : पावणे एमआयडीसीतील आदिवासी पाड्यांमध्ये विविध नागरी समस्या पाचवीलाच पुजल्या आहेत. अशातच गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून या परिसरात तीव्र पाणीटंचाई आहे. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी दीड किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.
पावणे एमआयडीसीमधील आदिवासी कुटुंबांचे वाल्मीकी आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरकुलात स्थलांतर केले आहे. पाण्याची व्यवस्था नसतानाही महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. परिणामी, पावणेतील वारली पाडा येथील ग्रामस्थांना थेंबभर पाण्यासाठी झगडावे लागत आहे. सुरुवातीला काही दिवस पालिकेने टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता; पण घरगुती वापरासाठी पिण्याचे पाणी जुन्या वारली पाड्यातून आणावे लागते होते. काही वर्षांपासून पावणे एमआयडीसातील आदिवासींचा हाच दिनक्रम आहे. सध्या शाळांना सुट्ट्या असल्याने मुलांना संपूर्ण वेळ पाणी भरण्यासाठी खर्ची करावा लागते. आदिवासी महिला तसेच पुरुष मंडळीना रोजनदारी सांभाळून पाणी भरावे लागत आहे.
--------------------------------------------
फुटलेल्या जलवाहिनीचा आधार
नवी मुंबई महापालिकेने या ठिकाणी पाण्याची टाकी उभारली आहे. घराघरात पालिकेने नळजोडणी दिली आहे. पण टाकीत पाणीच नसल्याने जलवाहिनी गंजू लागल्या आहेत. आजही पिण्याच्या पाण्यासाठी जुन्या वारली पाड्यातील नागरिकांना शालिमार कंपनीजवळ फुटलेल्या जलवाहिनीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे स्वतःचे मोरबे धरण असलेल्या मनपाच्या कार्यक्षेत्रातील आदिवासींची ‘नळ आहे....पण पाणी नाही’, अशी अवस्था झाली आहे.
-------------------------------------
विकत पाणी घेण्याची वेळ
सध्या नवीन पाड्यामधील रहिवासी जुन्या पाड्यावरील नळाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. दिवस-रात्र या नळावर पाण्यासाठी झुंबड उडालेली असते. काही वेळा शाब्दिक बाचाबाचीदेखील होते. अशातच एमआयडीसीकडून शुक्रवारी शटडाऊन होत असल्याने सोमवारीच मध्यरात्रीच पाणीपुरवठा होत असल्याने हातावर पोट असणाऱ्या आदिवासींना विकत पाणी घ्यावे लागत आहे.
----------------------------------------
महापालिकेने आमची फसवणूक केली आहे. घर देताना पाण्याची व्यवस्था केली जाईल, असे सांगितले होते. मात्र, अवघे काही दिवस पाणी मिळाले. त्यामुळे प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन पाण्याचा प्रश्न सोडवावा.
- कृष्ण वड, अध्यक्ष, घर बचाव समिती, वारली पाडा
-------------------------------------
माझ्या महिलांचा दिवस पाणी भरण्यातच खर्ची होत आहे. त्यात मुलांनाही आता पाणी भरावे लागते. यंदा उन्हाचा पारा जास्त असल्याने पाणी भरताना खूप त्रास सहन करावा लागतो.
- संतोष गवते, रहिवासी
पाण्यासाठी दीड किलोमीटरची पायपीट.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT