railway-accident
railway-accident sakal
मुंबई

Mumbai : सोळा महिन्यात रेल्वे अपघातात ९३ प्रवाशांनी जीव गमावला; रेल्वे रूळ ओलांडण्याची घाई जिवावर बेतली

सकाळ वृत्तसेवा

नवीन पनवेल - हार्बर मार्गावरील शेवटचे स्थानक तसेच कोकण रेल्वेचे प्रवेशद्वार असल्याने पनवेल स्थानकातून दररोज हजारोच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे वर्दळीच्या अशा या स्थानकात प्रवाशांच्या अपघातातही वाढ झाली असून सोळा महिन्यात रेल्वे अपघातात ९३ प्रवाशांना जीव गमवावा लागला असल्याने रेल्वे रूळ ओलांडण्याची अतिघाई अनेकांच्या जिवावर बेतली आहे.

कोकणात जाणाऱ्या एक्स्प्रेससाठीचे पनवेल रेल्वे स्थानक प्रवेशद्वार असल्याने या स्थानकातून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. प्रवाशांनी रेल्वेरूळ ओलंडू नये, म्हणून अनेक उपाययोजना करून देखील अपघात आटोक्यात येताना दिसत नाहीत. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

त्याचबरोबर होणारे अपघात अनेक उपाययोजना करून देखील आटोक्यात येताना निदर्शनास येत नाही. कोरोना दरम्यान रेल्वे अपघात एकदम कमी झाले होते. परंतु, पुन्हा अपघातात वाढ होत आहे. गेल्या चार महिन्यांत पनवेल रेल्वे स्थानकात २३ मृत तर ३५ प्रवासी जखमी झाले होते. तर गेल्या सोळा महिन्यात ९३ प्रवाशांना जीव गमवावा लागला असून झालेल्या अपघातांमध्ये रेल्वे रूळ ओलांडताना मृत पावलेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे इच्छित स्थळी जाण्याची घाई प्रवाशांच्या जिवावर बेतत आहे.

अपघाताची मुख्य कारणे -
- पनवेल रेल्वे स्थानक हे हार्बर मार्गावरील महत्त्वाचे तसेच मध्यवर्ती ठिकाण आहे. येथून रेल्वे कोकण रेल्वेला जोडली गेली आहे. त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. पण रेल्वे प्रवाशांच्या तुलनेत सुविधा तोकड्या पडत असल्याने पनवेल रेल्वे स्थानकात अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

- हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकालगत अनेक ठिकाणी संरक्षक भिंती उभारण्यात आलेल्या आहेत. मात्र तरी देखील रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. पनवेल रेल्वे स्थानकात अशा प्रकारची भिंत बांधली नसल्याने प्रवासी अनेकदा रेल्वे रुळावरून जात असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

शॉर्टकट बेततोय जिवावर
पनवेल रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवासी पुलाचा वापर करण्याएेवजी लोकल पकडणे किंवा फलाट बदलण्याच्या नादात शॉर्टकटचा रस्ता वापरतात. त्यामुळे घाईत रेल्वे रूळ ओलांडताना लक्ष नसल्याने अनेकदा अपघात झाले आहेत. तसेच रेल्वे प्रशासनाकडून अनेकदा प्रवासावेळी सुरक्षित प्रवासाच्या सूचनाही केल्या जात आहेत. मात्र, हे नियम पायदळी तुडवले जात असल्याने अपघात वाढले आहेत.

हेडफोनचा वापर धोकादायक
सध्या प्रवास करतात प्रवासी मोबाईलच्या नादात एेवढे गुंग झालेले असतात की बाजूला कोण बसले आहे, याचे देखील भान राहत नाही. कित्येक वेळा रेल्वे रूळ ओलांडताना समोरून किंवा पाठीमागून रेल्वे येत असल्याचा आवाजही त्यांना येत नाही. तसेच कानात हेडफोन किंवा ब्लू टूथ असताना रेल्वे मार्गावरून प्रवास करण्याची मानसिकता धोकादायक ठरत आहे.

पनवेल रेल्वे स्थानकात रेल्वे रूळ ओलांडू नये म्हणून रेल्वेकडून मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे. तशा सूचना ध्वनिक्षेपकातून वारंवार दिल्या जातात. तसेच रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे.
- सूरज पडवी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पनवेल रेल्वे पोलिस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT