मुंबई

दरोड्याचा तपास ठाणे क्राईम ब्रॅंचकडे

CD

उल्हासनगर, ता. २६ (बातमीदार) : नेपाळी वॉचमनने त्याची पत्नी आणि साथीदारांच्या मदतीने उल्हासनगरातील विजयालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानात दरोडा टाकून ३ कोटी २० लाखांचे सोने लंपास केले होते. या घटनेला एक महिना झाला तरी अद्यापही आरोपीचा ठावठिकाणा सापडत नसल्याने हे प्रकरण अधिवेशनात गेले आहे. या प्रकरणाचा तपास ठाणे क्राईम ब्रॅंचकडे सोपवण्याची मागणी आमदार कुमार आयलानी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शिरू चौक परिसरात असलेले विजयालक्ष्मी ज्वेलर्सचे दुकान मंगळवारी बंद असते. याचाच फायदा घेत २६ जून रोजी रात्री नेपाळी वॉचमन महेश व त्याच्या पत्नीसह चार ते पाच जणांनी दरोडा टाकला. चार गॅस कटरच्या मदतीने तिजोऱ्या फोडून त्यातील तब्बल ३ कोटी २० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. पोलिस उपायुक्त डॉ. सुधाकर पाठारे, सहायक पोलिस आयुक्त अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप फुलपगारे हे या घटनेचा तपास करीत आहेत; मात्र आरोपींचा ठावठिकाणा सापडत नसल्याने या प्रकरणाचा तपास ठाणे क्राईम ब्रॅंचकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी आमदार कुमार आयलानी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT