Mumbai weather News sakal
मुंबई

Mumbai News: बदललेल्या हवामानामुळे मुंबईकरांचे आरोग्य बिघडले!

CD

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत गारवा जाणवू लागला होता. अशात पुन्हा गेल्या दोन दिवसांपासून सकाळ आणि रात्रीच्या तापमानात मोठा फरक जाणवत आहे. त्याचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होत आहे. सध्या नोंदवण्यात आलेल्या तापमानानुसार दिवसा आणि रात्रीच्या तापमानात सुमारे १६ अंश इतका फरक आहे. परिणामी संसर्गाचा (व्हायरल इन्फेक्शन) धोका वाढला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून डॉक्टरांनी थंड आणि बाहेरचे अन्न टाळण्याचा सल्ला दिला आहे.

मुंबईत चांगलीच थंडी पडल्यानंतर आता दिवसाच्या तापमानात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ३० अंशाहून कमी असलेले दिवसाचे तापमान आता ३५ अंशांच्या जवळ पोहोचले आहे. तसेच रात्रीचे तापमान १७ ते १८ अंशांच्या दरम्यान आहे. त्यामुळे दिवसा उकाडा आणि रात्री थंडीचा सामना मुंबईकरांना करावा लागत आहे. या तापमान बदलामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होत आहे.

अशा हवामानात व्हायरल इन्फेक्शनचा धोका वाढतो, असे बॉम्बे रुग्णालयाचे फिजिशियन डॉ. कपिल सालगिया यांनी सांगितले. दिवसा उकाडा असेल तर लोकांनी उन्हातून आल्यानंतर अचानक एसीमध्ये बसणार नाही याची काळजी घ्यावी. थंड अन्न टाळले पाहिजे. जर तुम्हाला प्रदूषणाची ॲलर्जी असेल तर मास्क घाला, असा सल्ला त्यांनी दिला.


हिरानंदानी रुग्णालयाचे संसर्गजन्य रोग विशेषज्ञ डॉ. नीरज तुलारा यांनी सांगितले की, जेव्हा तापमानात १० अंशांपेक्षा जास्त फरक असतो. तेव्हा सर्दी-खोकला यांसारख्या विषाणूजन्य संसर्गाचा धोका वाढतो. तसेच श्वसनमार्गाच्या संसर्गाची समस्या वाढते. दिवसा उष्ण आणि रात्री थंड अशा वातावरणात उन्हात बाहेर जाणे टाळावे आणि थंडी जाणवू नये म्हणून संध्याकाळी उबदार कपडे घालावेत. सकाळच्या वेळी प्रदूषणामुळेही ॲलर्जीचा त्रासही वाढू शकतो, असे त्यांनी सांगितले.

पारा ३४.३ अंशांवर
मुंबई उपनगरात रविवारी कमाल तापमान ३४.३ अंश सेल्सिअसवर पोहोचले, तर किमान तापमान १७.९ अंश नोंदवले गेले. शहराचे कमाल तापमान ३१.४ अंश, तर किमान तापमान २०.७ अंश नोंदले गेले.

गुरुवारनंतर तापमानात घट
दक्षिण-पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे मुंबईचे कमाल तापमान ३५ वरून ३६ अंशांपर्यंत जाईल, असे हवामानतज्ज्ञ हृषिकेश आंग्रे यांनी सांगितले. तसेच किमान तापमान १८ ते २० अंश दरम्यान राहील. तसेच गुरुवारपासून तापमानात घट होईल, असा अंदाज आंग्रे यांनी वर्तवला.

अचानक वाढलेल्या तापमानामुळे लोकांची अवस्था बिकट झाली आहे. स्वत:ला थंड ठेवण्यासाठी विविध उपाययोजना कराव्या लागत आहे. बदलत्या हवामानामुळे कधी थंडीपासून तर कधी उष्णतेपासून स्वत:ला सुरक्षित ठेवणे फार कठीण जाते. काही संसर्गजन्य विषाणू श्वसनमार्गाला संसर्ग करून नाक आणि घशावर परिणाम करतात. त्यामुळे नाक बंद होणे, घसा खवखवणे, खोकला आणि ताप यांसारखी लक्षणे दिसू लागतात.
- डॉ. रोहित हेगडे, छाती विकारतज्ज्ञ, जे. जे. रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT