मुंबई

सानपाडा भुयारी मार्गात वाहतूक कोंडी

CD

तुर्भे, ता. २५ (बातमीदार) : सिडकोने नियोजन करून वसवलेल्या सानपाडा नोडमध्ये गरजेनुसार सोयी-सुविधा विकसित न केल्याने हा नोड वाहतूक कोंडीत अडकला आहे. हार्बर रेल्वे मार्गाच्या पश्‍चिमेकडे वसलेल्या नोडमध्ये प्रवेश करण्यासाठी एकच मार्ग आहे. पर्यायी मार्ग नसल्याने सानपाड्यातील रहिवाशांना रोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. सानपाडा रेल्वे स्थानकापासून पूर्व-पश्‍चिम असा प्रवास करण्यासाठी एकच भुयारी मार्ग हा पर्याय आहे. त्यामुळे कायम या मार्गावर वाहनांची कोंडी होत असल्याचे वाहनचालकांना सकाळ आणि संध्याकाळी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
वाढती लोकसंख्या व त्यासोबत वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे सानपाडा येथील भुयारी मार्ग अपुरा पडत असल्याचे दिसून येत आहे. नियमित हजारो वाहने या भुयारी मार्गाचा वापर करीत असतात; परंतु नियमित सकाळी व सायंकाळी अपुऱ्या भुयारी मार्गामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी नित्याचीच होत असल्यामुळे नागरिकांचा वेळ व इंधन वाया जात आहे. अनेकदा रेल्वे स्थानकाच्या दुतर्फा वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे प्रवासी वाहनचालक व नागरिकांमध्ये वाद निर्माण होत असतात. यावर कायस्वरूपी तोडगा म्हणून भुयारी मार्ग किंवा पर्यायी उड्डाणपूल उभारण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नीलेश कचरे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : सामान्यांची एकीची वीण उसवू नये- शरद पवार

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT