मुंबई

कृषी विज्ञान केंद्राच्या उपाययोजनांवर भर द्या

CD

वाणगाव, ता. २ (बातमीदार) : शेतीमध्ये आजकाल अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बदलत्या हवामानामुळे शेतीचे नियोजन करणे अवघड झाले आहे. मागील खरिप हंगामात भात कापणीच्या वेळी पाऊस झाला आणि पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना आता खरिपाचे वेध लागले असून त्यापूर्वी कृषी विज्ञान केंद्राने आखून दिलेल्या उपाययोजनांचा अवलंब करावा, असे कोसबाड हिल कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी सांगितले.

रब्बी, उन्हाळी हंगामात ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, अतिउष्णता या कारणांमुळे भाजीपाला, फळांचे नुकसान झाले. आता आशा खरिप पिकावर अवलंबून आहे. एकदा पावसाने चांगली सुरुवात केली की, शेतीच्या कामाची लगबग सुरू होईल, पण त्यापूर्वीच सुयोग्य नियोजन केले तर शेतकऱ्याला निश्‍चितच चांगला फायदा होऊ शकतो. भारतीय हवामान खात्याने यावर्षी चांगला पाऊस होईल, असे वर्तवण्यात आले आहे. खरिप हंगामात भात हे मुख्य पीक असल्याने अधिक उत्पादनासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. पावसाचा खंड पडल्यास अथवा पूर परिस्थिती उद्भवल्यास पीक विमा योजनेचा फायदा घ्यावा, यासाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधून वेळेत अर्ज करावा, असेही त्यांनी सांगितले.


कृषी विज्ञान केंद्राच्या उपाययोजना :
नांगरलेले शेत स्वच्छ करावे. शेत जमिनीची व्यवस्थित बांधबंधिस्ती करावी. भात लागवडीच्या जमिनीची आरोग्य पत्रिका काढून घ्यावी. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या माती परीक्षण प्रयोगशाळेत जाऊन माती नमुन्याची तपासणी करावी. जमिनीचा प्रकार व भात पिकाची जात निवडताना ती अधिक उत्पन्न देणारी सुधारित किंवा संकरित असावी. बियाणे विक्रेत्यांकडून त्याची छापील पक्की पावती घेऊन ती जपून ठेवावी. रासायनिक खतांना पर्याय म्हणून हिरवळीच्या खतांचा वापर केल्यास जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होईल. भाताचे बी पेरण्यापूर्वी मिठाच्या पाण्याची आणि बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यास रोगाचे किफायतशीर नियंत्रण व उगवण चांगली होण्यास मदत होते. वेळेवर मजूर मिळणे शक्य नसल्याने शेतकरी बंधूंनी टोकन पद्धत, एसआरटी तंत्रज्ञानाने भात लावणी करावी. भात रोपवाटिका तयार करण्यासाठी ट्रे पद्धतीने सुदृढ भात रोपे तयार करणे आवश्यक आहे. वेळेवर पेरणी, लावणी, कापणी या त्रिसूत्रीचे काटेकोर पालन केल्यास भात पीक फायदेशीर ठरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : आजीबाईने डिलीट केले १२ व्होट..! अर्ज कोणी केला, काय म्हणाल्या गोडाबाई? राहुल गांधींनी समोर आणला 'घोळ'

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयुक्तांना १८ वेळा पत्र पाठवले, तरीही काहीही उत्तर मिळाले नाही

Asia Cup 2024 Super 4 Scenario : भारत, पाकिस्तान यांची जागा पक्की; अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांना काय करावं लागणार?

ज्ञानेश कुमार मतचोरांचं संरक्षण करतायत, मी पुराव्याशिवाय बोलत नाहीय : राहुल गांधी

iPhone Air! अ‍ॅपलचा कागदासारखा पातळ स्मार्टफोन; कुणी खरेदी करावा अन् कुणी अजिबात घेऊ नये? एकदा बघाच

SCROLL FOR NEXT