मुंबई

गोवेली गावाला २५ वर्षानंतर शुद्ध पाणी

CD

गोवेली गावाला २५ वर्षांनंतर शुद्ध पाणी
सेफ वॉटर नेटवर्कचा आयजल स्टेशन उपक्रम

टिटवाळा, ता. ८ (वार्ताहर) : पाण्यासाठी अनेक ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना वणवण करावी लागते. अशा परिस्थितीत शुद्ध पाणी मिळणे म्हणजे येथील ग्रामीण भागासाठी केवळ अशक्य बाब आहे; मात्र कल्याण तालुक्यातील गोवेली गावात समाजसेवक कैलाश धुमाळ तसेच राम चोरगे यांच्या सहकार्यातून तसेच सेफ वॉटर नेटवर्कच्या इंडिया या संस्थेच्या माध्यमातून तब्बल २५ वर्षानंतर शुद्ध पाणी मिळाले आहे .

गोवेली गावात गेली अनेक वर्षे पाण्याची समस्या भेडसावत होती. त्यातूनच स्वच्छ पाणी मिळणे हे दुरापास्तच होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गावातील समाजसेवक धुमाळ तसेच त्यांचे चोरगे व अन्य मंडळी यांनी पुढाकार घेत स्वच्छ, सुरक्षित व परवडणाऱ्या दरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी कार्यरत असलेल्या सेफ वॉटर नेटवर्क इंडिया संस्थेच्या उपक्रमाबद्दल माहिती मिळवत आपल्या गोवेली गावासाठी संस्थेचा आयजल स्टेशन हा उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून ग्रामस्थांना एका प्रीपेड कार्डच्या माध्यमातून २० लिटर पाण्याचा जार हा केवळ सात रुपयांत मिळणार असल्याची माहिती संस्थेचे शंकर बत्रा यांनी गोवेली गावातील आयजल स्टेशन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी दिली.

कार्यक्रमाला समाजसेवक कैलाश धुमाळ, राम चोरगे, गोवेली गावच्या सरपंच पूजा जाधव, माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत, माजी सभापती योगेश धुमाळ तसेच इक्बाल मणियार यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. सेफ वॉटर नेटवर्क या संस्थेने आतापर्यंत ३४३ जलकेंद्रे स्थापन करून सुमारे १३ लाख नागरिकांना थेट लाभ दिला आहे. या जल केंद्रांमुळे महिलांचा वेळ वाचतो आहे, आरोग्य सुधारते आहे आणि सामाजिक विकासाला चालना मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day: शनिवार वाड्यावर कोणी फडकवला होता तिरंगा?फुकट चहा ते थिएटरमध्ये नारळ,15 ऑगस्ट 1947 ला पुणेकरांचा जल्लोष!

स्कुबा डायव्हिंग करताना अंकिता वालावलकरला झाली दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'नाकातून रक्त येयला लागलं आणि...'

Latest Marathi News Live Updates : कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी शेतातच तिरंगा फडकावला

Pandit Nehru Speech Video : भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिन भाषणात काय बोलले होते पंडित नेहरू? व्हिडिओ पाहून म्हणाल जय हिंद!

Video : काळीज पिळवटणारी घटना! धोधो पाऊस अन् चालत्या गाड्यांवर कोसळलं झाड; जाग्यावर लोकांचा मृत्यू, धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल

SCROLL FOR NEXT