किन्हवली, ता. ११ (बातमीदार)ः शहापूर तालुक्यातील टाकीपठार आदिवासी पट्ट्यात एप्रिलच्या मध्यापासूनच तीव्र पाणीटंचाई आहे. विहिरी, कूपनलिकांचे पाणी आटल्याने पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत असल्याने मुंबईतील सत् करम फाउंडेशन स्वयंसेवी संस्थेने परिसरातील आंबेखोर, साखरवाडी, रिकामवाडी गावपाड्यांसाठी टॅंकरद्वारे मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे.
उंचावरील पठार असलेल्या टाकीपठार परिसरातील आदिवासी पाड्यांवर दरवर्षी पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संतोष दवणे यांच्या माध्यमातून मुंबईतील सत् करम फाउंडेशनशी संपर्क साधण्यात आला होता. त्यानुसार संस्थेचे अध्यक्ष ॲड. अनुज नरुला, संचालक दत्तात्रय सावंत यांना आदिवासी पाड्यांना भेटी देताना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. या सुविधेमुळे आंबेखोर, कवटेवाडी, भल्याचीवाडी, पारधवाडी पाड्यांना पाणी उपलब्ध झाले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच सत् करमचे चेअरमन अनुज नरुला, संचालक दत्तात्रय सावंत, खेमाजी भागित, विनोद साडविलकर, साक्षात गुंजाळ, अमित निगोट यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी आदिवासीवाड्यांवरील पाणीटंचाई लक्षात घेता पाऊस पडेपर्यंत मोफत पाणी देण्यात येणार असल्याचे संतोष दवणे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.