वाशी, ता. १८ (बातमीदार) : वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. १९) सकाळी १०.३० वाजता वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपली निवेदने लेखी स्वरूपात तीन प्रतीत सादर करावीत. या जनता दरबारात नागरिक आपले नाव नोंदणी करून आपल्या समस्या किंवा अडचणींचा निपटारा करू शकणार आहेत. यापूर्वी झालेल्या जनता दरबारामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. सोमवारी होणाऱ्या जनता दरबारामध्ये नागरिकांनी आपल्या समस्या मांडून त्यांचा निपटारा करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.