मुंबई

कृषि निविष्ठा तक्रार निवारणासाठी भरारी पथक

CD

कृषि निविष्ठा तक्रार निवारणासाठी भरारी पथक
राज्य कृषी आयुक्‍तालयाचा पुढाकार; थेट संपर्क साधण्याचे आवाहन
पालघर, ता. २६ (बातमीदार) ः महाराष्ट्र राज्य कृषी आयुक्तालय, पुणे यांच्या सुचनेनुसार पालघर जिल्ह्यात शेतकऱ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण कृषि निविष्ठा बियाणे, खते, कीटकनाशके उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषि विभागामार्फत जिल्हास्तरीय एक आणि तालुकास्तरीय आठ अशी एकूण नऊ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांद्वारे शेतकऱ्यांच्या कृषि निविष्ठांशी संबंधित तक्रारींचे तातडीने निवारण करण्याचे उद्दिष्ट आहे.
जिल्हास्तरीय भरारी पथकाचे प्रमुख कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद पालघर, सोमनाथ पिंजारी (संपर्क: ८३२९०७३९३४) यांच्या नेतृत्वाखाली हे पथक कार्यरत आहे. या पथकात विश्वास बर्वे (उपविभागीय कृषि अधिकारी, संपर्क: ९४०३५१००७५), ए. जे. राऊळ (मोहीम अधिकारी, संपर्क: ९०४९४९७३३९), काकासाहेब भालेकर (निरीक्षक वजने व मापे, संपर्क: ८४२५०३७६८६) आणि लक्ष्मण लामकाने (जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, संपर्क: ९९२१५४३४९९) हे सदस्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. प्रत्येक तालुक्यात तालुका कृषी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली तालुकास्तरीय भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये तालुका कृषि अधिकारी (पथक प्रमुख), कृषि अधिकारी (तालुका कार्यालय), निरीक्षक वजने व मापे, मंडळ कृषि अधिकारी आणि गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक (पंचायत समिती) यांचा समावेश आहे. ही पथके तालुकास्तरावर शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करतील. या पथकामध्ये कृषि निविष्ठांशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी शेतकरी वरील संपर्क क्रमांकांवर थेट पथक प्रमुखांशी संपर्क साधता येणार आहे. कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा मिळाव्यात आणि त्यांची कोणतीही फसवणूक होऊ नये, यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून या भरारी पथकांमुळे शेतकऱ्यांना तक्रार निवारणाची प्रभावी यंत्रणा उपलब्ध झाली आहे, शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले आहे.
............................
जिल्हास्तरीय भरारी पथक प्रमुख सोमनाथ पिंजारी यांनी शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाच्या निविष्ठा मिळाल्या असतील किंवा फसवणुकीचा अनुभव आला असेल, तर त्यांनी तातडीने जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय भरारी पथकांशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी नोंदवून त्यांचे त्वरित निवारण करून घ्यावे, असे आवाहन केले आहे. या उपाययोजनांमुळे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या कृषि निविष्ठांशी संबंधित समस्यांचे त्वरित आणि प्रभावी निवारण मिळण्याचा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
..................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT