नेरूळ, ता. २८ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका दरवर्षी शेकडो झाडे शहरात लावत असते. पालिकेने ‘मियावाकी’सारखे देशी झाडांचे प्रकल्प राबवून शहरातील पर्यावरण वाढवण्याचा प्रयत्न केला आहे; मात्र पालिकेला शहरातील पदपथावरील झाडांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. पदपथावर वृक्षरोपणासाठी जागा सोडण्यास अभियंता विभागाला उद्यान विभागाकडून कोणत्याही सूचना दिल्या गेल्या नसल्याचे यातून दिसून येत आहे. या पदपथांवर हजारो वृक्षांची लागवड करण्याची संधी पालिकेकडून दवडली गेली आहे. नवी मुंबई शहरातील पेव्हर ब्लॉक असलेल्या पदपथांवर पालिकेने अनेक झाडे लावलेली आहेत. पालिका पेव्हर ब्लॉकमुक्त असे काँक्रीटचे पदपथ शहरात तयार करीत आहे; मात्र हे करताना पालिकेच्या अभियंता विभागाला झाडांसाठी जागा सोडण्याचा विसर पडला आहे. मुख्य म्हणजे उद्यानावर भर देणाऱ्या उद्यान विभागाला पदपथांवरील वृक्षरोपणाबाबत काहीही देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे. ज्या पदपथांवर दिवसभर नागरिकांचा राबता असतो, असे शहरातील अनेक पदपथ झाडाविना रखरखीत दिसून येत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.